शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत । हमीभावाअभावी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होतेय लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकºयांना साधारण उत्पन्न झाले. परंतु, शेतातील पीक हातात येत असताना कोरोनाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पाडली. खरिप हंगाम तोंडावर आला असताना बि-बियाणे खरेदी, शेतीच्या मशागतीसाठी पैसा शेतकºयांकडे उपलब्ध नाही. शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिळेल त्या भावात पिकविलेला माल व्यापाºयांना विकत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन व्यापारी माल खरेदी करत आहे. पिकविलेल्या मालापेक्षा मजुरांचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या भावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना येण्याजाण्याचा ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.लागवडीची सोय नाहीआज तालुक्यात सालगड्याचे साल एक लाख २५ हजार आहे. माणसाची रोजी ३५० रूपये, डवरण २५० रूपये, फवारणी दर ३०० रुपये आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बँका कर्ज देऊ शकत नाही. पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर कुटुंब असल्याने शेती करावी लागते. दुसरा व्यवसाय नाही. संस्था अध्यक्ष, सचिव यांच्याकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहे. थकीत असल्याने कर्जही देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही लागवडीची सोय करता आली नाही.एकरी २६ हजारांचा खर्चनांगरणी खर्च दीड हजार रुपये, वखरणी २०० रूपये, रोटावेटर १ हजार २०० रूपये, पेरणी ४०० रूपये, शेणखत ६ हजार रुपये, रासायनिक खत पाच हजार, औषधी ६ हजार, वेचणी ६ हजार, थ्रेशर १ हजार, हमाली व माल घरी येईपर्यंत १ हजार ५०० रुपये तसेच रासायनिक खतांचा खर्च असा एकूण २६ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च करताना शेतकऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती