शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत । हमीभावाअभावी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होतेय लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकºयांना साधारण उत्पन्न झाले. परंतु, शेतातील पीक हातात येत असताना कोरोनाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पाडली. खरिप हंगाम तोंडावर आला असताना बि-बियाणे खरेदी, शेतीच्या मशागतीसाठी पैसा शेतकºयांकडे उपलब्ध नाही. शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिळेल त्या भावात पिकविलेला माल व्यापाºयांना विकत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन व्यापारी माल खरेदी करत आहे. पिकविलेल्या मालापेक्षा मजुरांचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या भावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना येण्याजाण्याचा ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.लागवडीची सोय नाहीआज तालुक्यात सालगड्याचे साल एक लाख २५ हजार आहे. माणसाची रोजी ३५० रूपये, डवरण २५० रूपये, फवारणी दर ३०० रुपये आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बँका कर्ज देऊ शकत नाही. पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर कुटुंब असल्याने शेती करावी लागते. दुसरा व्यवसाय नाही. संस्था अध्यक्ष, सचिव यांच्याकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहे. थकीत असल्याने कर्जही देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही लागवडीची सोय करता आली नाही.एकरी २६ हजारांचा खर्चनांगरणी खर्च दीड हजार रुपये, वखरणी २०० रूपये, रोटावेटर १ हजार २०० रूपये, पेरणी ४०० रूपये, शेणखत ६ हजार रुपये, रासायनिक खत पाच हजार, औषधी ६ हजार, वेचणी ६ हजार, थ्रेशर १ हजार, हमाली व माल घरी येईपर्यंत १ हजार ५०० रुपये तसेच रासायनिक खतांचा खर्च असा एकूण २६ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च करताना शेतकऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती