शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद येथील ‘भ्रष्टाचार मुक्त भारत सायकल यात्रा’ बापू कुटीत

By admin | Updated: October 6, 2015 02:47 IST

भ्रष्टाचार मुक्त भारत ही कल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. प्रत्येक विभागातच भ्रष्टाचार बोकाळला

दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्रामभ्रष्टाचार मुक्त भारत ही कल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. प्रत्येक विभागातच भ्रष्टाचार बोकाळला असून यातून तुरुंगसुद्धा सुटलेले नाही. कीड ज्याप्रमाणे पिकांचा सर्वनाश करते त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आहे. याकरिता जनजागृती करण्याकरिता काढण्यात आलेली सायकल रॅली बापूकुटीत पोहोचली. येथे प्रार्थना करून भ्रष्टाचार मुक्त तुरुंग आणि खेळांच्या विकासांची संकल्पना मांडत असलेली ही रॅली पुढचा प्रवास करेल, असे सायकल यात्रा प्रमुख उपतुरुंग अधीक्षक एम.संपथ यांनी ‘लोकमत’ला दिली. हैद्राबाद येथील चारमिनार परिसरातून भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीकरिता सायकल यात्रेवर निघालेले १२ सायकलस्वार रविवारी सायंकाळला सेवाग्राम येथे पोहोचले. ही यात्रा ३० सप्टेंबर २०१५ रोजी निघाली. सेवाग्राम येथे त्यांचा प्रवास ५१० कि़मी.च्या झाला असून यात्रेला पाच दिवस झाले. सोमवारी सकाळी सर्व सायकलस्वारांनी महात्मा गांधी स्मारकांची माहिती घेतली.यावेळी एम. संपत म्हणाले, दिवसाला १०० कि़मी.चा प्रवास आम्ही करीत आहोत. ठिकठिकानच्या शाळा आणि लोकांना भेटून आम्ही आमचा उद्देश सांगत असून आतापर्यंत सर्वत्र चांगले सहकार्य मिळाले आहे. लोकांमध्ये खेळ, उत्तम आरोग्य या बाबी रूजल्या तर नक्कीच भ्रष्टाचाराकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलेल. आम्ही सर्व तुरुंग विभागाशी संबंधित आहोत. यात एस. निवास रेड्डी तुरुंगाधिकारी आहेत. आर. राजेंद्र व इ. नागराजू उप तुरुंगाधिकारी आहेत. अन्य सर्व वॉर्डन आहे. नागपूर, पांडूर्णा, बैतूल असा प्रवासकरिता १७ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंग इंडिया गेट येथे या यात्रेचा समारोप होईल. यात्रेचा पूर्ण प्रवास १८०० कि़मी. होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्याचे एम. संपथ व सहकाऱ्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आश्रमचे हिरा शर्मा, बाबा खैरकर, सिद्धेश्वर उंबरकर, अशोक गिरी, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, प्रसाद, संगीता चव्हाण, जयश्री पाटील, नथ्थू थुल इत्यादी उपस्थित होते. 8दिवसाला १०० कि़मी.चा प्रवास आम्ही करीत आहोत. हा पूर्ण प्रवास १८०० कि़मी. होणार आहे. नागपूर, पांढुर्णा, बैतूल असा प्रवास करीत १७ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंग इंडिया गेट या ठिकाणी या यात्रेचा समारोप होईल.8देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. या प्रवासात सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या आश्रमातून एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले.