शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला नगरसेवकांनी लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:28 IST

स्थानिक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी संतप्त नगरसेवकांनी कुलूप लाऊन आपला रोष व्यक्त केला. यामुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला असून यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा प्रभावित : कर्मचारी बाहेरच

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी संतप्त नगरसेवकांनी कुलूप लाऊन आपला रोष व्यक्त केला. यामुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला असून यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.गत अनेक दिवसांपासून शहरातील अनेक प्रभागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तसेच स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या आहे. जनतेच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतल्या जात नाही. यामुळे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अंकुश ठाकूर, सोनू गवळी, राकाचे गटनेते सौरभ तिमांडे, धंनजय बकाने, प्रकाश राऊत, या नगरसेवकांनी दुपारी ११ वाजता नपाच्या आवारातील पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावले. त्यामुळे या विभागाचे सर्व कर्मचारी कार्यालयाचे बाहेर उभे होते. या संतप्त नगरसेवकानी त्यानंतर नप अध्यक्ष प्रेम बसंतांनी यांची भेट घेतली; परंतु नगरसेवकांची नाराजी दूर झाली नाही. सदर वृत्त लिहेपर्यंत पाणी पुरवठा कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नव्हते. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागल्याचे वास्तव आहे.उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असल्याने पालिकेनी ही समस्या तत्काळ मार्गी काढावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. याकडे नराध्यक्षांनी लक्ष देत तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.प्रशासन चालविणे ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. काही कर्मचारी वर्गाच्या बदल्या केल्यामुळे काही नगरसेवक नाराज झाले आहे. शहरातील जनतेला पाण्याबाबत होत असलेला त्रास लवकरच दूर होईल व त्याबाबत योग्य नियोजन सुरू आहे.- प्रेम बसंतांनी, नगराध्यक्ष