शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:39 IST

मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो.

ठळक मुद्दे३५ टक्के वसुली : २५ हजार ४९७ मालमत्तांची नोंद

आॅनलाईन लोकमतवर्धा : मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो. यामुळे १०० टक्के कर वसुली अनिवार्य असते; पण मागील काही वर्षांपासून वर्धा नगर पालिकेच्या कर वसुलीचा टक्का पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. नागरिक कर वेळेवर भरत नसल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकला आहे. परिणामी, विकास कामांत अडथळे निर्माण होत असून शासनाकडून मिळणारा निधीही अडकत आहे.वर्धा नगर परिषदेकडे शहरात तब्बल २५ हजार ४९७ मालमत्ता आहेत. या स्थावर व जंगम मालमत्तेतून पालिकेला प्रत्येक वर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा कर अपेक्षित आहे; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने पालिकेला विकास कामांवर खर्च करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मागील दोन-तीन वर्षांपासून नगर परिषदेकडून कर वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. यातून ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कर वसुली होत आहे; पण कधीही १०० टक्के वसुली झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीही वर्धा नगर परिषदेची कर वसुली ६५ ते ७० टक्केच झाली. यामुळे नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. मागील वर्षीपर्यंतचा तब्बल पाच कोटी रुपयांचा कर नागरिकांकडे थकित आहे. आता चालु आर्थिक वर्षाचा करही अद्याप नागरिक स्वत:हुन भरत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण तथा अन्य कामकाजांमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांना कर वसुलीकरिता कमी वेळ मिळत आहे. असे असले तरी आजपर्यंत ३५ टक्के कर वसुली झाल्याची माहिती कर अधीक्षक रवींद्र जगताप यांनी दिली. पालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहराचा विकास व्हावा यासाठी नागरिक, व्यापाºयांनी कर वेळेवर अदा करणे गरजेचे आहे; पण शहरातील अनेक नागरिक, व्यापारी तीन-चार वर्षे पालिकेचा करच अदा करीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, नगर परिषदेला जप्तीची कारवाई करावी लागते.नागरिक स्वत:हुन कर अदा करीत नसल्याने मागील दोन वर्षांपासून पालिकेची धडक कर वसुली तथा जप्तीची मोहीम अव्याहत सुरू आहे. पालिकेकडून अनेक घर, दुकानांना सील लावण्यात आले आहे. यातून दंड तथा कर वसुल करण्यात आला आहे. असे असले तरी नागरिक, व्यापारी कर भरण्यात पुढाकार घेत नसल्याने पालिकेला उद्दिष्ट पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे....तर विकास कामांना मिळेल चालनाशहरातून पालिकेला दरवर्षी पाच कोटी रुपयांचा कर येतो. १०० टक्के वसुली झाली तरी शहरातील विकास कामांना चालना देणे शक्य होते; पण नागरिक पुढाकार घेऊन कर अदा करीत नसल्याने पालिकेला आर्थिक टंचाईला सामोर जावे लागते. सध्या पालिकेचा १० कोटी रुपयांचा कर थकित आहे. यामुळे शहरातील विकास कामे करताना अडथळे येत आहेत. शिवाय शासनाकडून निधी मिळण्यातही अडचणी येत आहेत.दुकानासह चार घरांची केली जप्तीपालिकेने मालमत्ता जप्तीच्या कारवाईस प्रारंभ केला. कर देयक व नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने जप्तीचे अधिपत्र काढून बुधवारी वॉर्ड क्र ३७ हिंदनगर येथील नामेदव बाजीराव सुटे यांचे घर, वॉर्ड क्र. ६ सुदामपुरी येथील दुर्गाबाई मारोतराव मिसाळ यांचे दुकान, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील उषा दिलीप तिवारी यांचे घर, वॉर्ड क्र. ३२ दयालनगर चांदीबाई गुरूदासमल लालवाणी यांचे घर, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील वसंतराव शंकरराव वैद्य यांचे घर या मालमत्ता सील करीत जप्तीची कार्यवाही केली. पथकात पथक प्रमुख रवींद्र जगताप, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, प्रदीप मुनघाटे, आशिष गायकवाड, चंदन महत्वाने आदींचा समावेश आहे.नगर पालिकेला १०० टक्के कर वसूल झाल्यास ५ कोटी रुपये मिळतात; पण नागरिक वेळेवर कर अदा करीत नाहीत. यामुळे यंदा १० कोटी रुपयांचा कर थकित झाला आहे. धडक कर वसुली मोहीम सातत्याने सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कर अदा केला पाहिजे.- रवींद्र जगताप, कर अधीक्षक, नगर परिषद, वर्धा.शहरातील विकास कामे करण्याकरिता तथा शासनाकडून निधी मिळविण्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे असते; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने विकास कामांत अडथळे येतात. नागरिकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा.