शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:39 IST

मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो.

ठळक मुद्दे३५ टक्के वसुली : २५ हजार ४९७ मालमत्तांची नोंद

आॅनलाईन लोकमतवर्धा : मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो. यामुळे १०० टक्के कर वसुली अनिवार्य असते; पण मागील काही वर्षांपासून वर्धा नगर पालिकेच्या कर वसुलीचा टक्का पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. नागरिक कर वेळेवर भरत नसल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकला आहे. परिणामी, विकास कामांत अडथळे निर्माण होत असून शासनाकडून मिळणारा निधीही अडकत आहे.वर्धा नगर परिषदेकडे शहरात तब्बल २५ हजार ४९७ मालमत्ता आहेत. या स्थावर व जंगम मालमत्तेतून पालिकेला प्रत्येक वर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा कर अपेक्षित आहे; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने पालिकेला विकास कामांवर खर्च करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मागील दोन-तीन वर्षांपासून नगर परिषदेकडून कर वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. यातून ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कर वसुली होत आहे; पण कधीही १०० टक्के वसुली झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीही वर्धा नगर परिषदेची कर वसुली ६५ ते ७० टक्केच झाली. यामुळे नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. मागील वर्षीपर्यंतचा तब्बल पाच कोटी रुपयांचा कर नागरिकांकडे थकित आहे. आता चालु आर्थिक वर्षाचा करही अद्याप नागरिक स्वत:हुन भरत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण तथा अन्य कामकाजांमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांना कर वसुलीकरिता कमी वेळ मिळत आहे. असे असले तरी आजपर्यंत ३५ टक्के कर वसुली झाल्याची माहिती कर अधीक्षक रवींद्र जगताप यांनी दिली. पालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहराचा विकास व्हावा यासाठी नागरिक, व्यापाºयांनी कर वेळेवर अदा करणे गरजेचे आहे; पण शहरातील अनेक नागरिक, व्यापारी तीन-चार वर्षे पालिकेचा करच अदा करीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, नगर परिषदेला जप्तीची कारवाई करावी लागते.नागरिक स्वत:हुन कर अदा करीत नसल्याने मागील दोन वर्षांपासून पालिकेची धडक कर वसुली तथा जप्तीची मोहीम अव्याहत सुरू आहे. पालिकेकडून अनेक घर, दुकानांना सील लावण्यात आले आहे. यातून दंड तथा कर वसुल करण्यात आला आहे. असे असले तरी नागरिक, व्यापारी कर भरण्यात पुढाकार घेत नसल्याने पालिकेला उद्दिष्ट पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे....तर विकास कामांना मिळेल चालनाशहरातून पालिकेला दरवर्षी पाच कोटी रुपयांचा कर येतो. १०० टक्के वसुली झाली तरी शहरातील विकास कामांना चालना देणे शक्य होते; पण नागरिक पुढाकार घेऊन कर अदा करीत नसल्याने पालिकेला आर्थिक टंचाईला सामोर जावे लागते. सध्या पालिकेचा १० कोटी रुपयांचा कर थकित आहे. यामुळे शहरातील विकास कामे करताना अडथळे येत आहेत. शिवाय शासनाकडून निधी मिळण्यातही अडचणी येत आहेत.दुकानासह चार घरांची केली जप्तीपालिकेने मालमत्ता जप्तीच्या कारवाईस प्रारंभ केला. कर देयक व नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने जप्तीचे अधिपत्र काढून बुधवारी वॉर्ड क्र ३७ हिंदनगर येथील नामेदव बाजीराव सुटे यांचे घर, वॉर्ड क्र. ६ सुदामपुरी येथील दुर्गाबाई मारोतराव मिसाळ यांचे दुकान, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील उषा दिलीप तिवारी यांचे घर, वॉर्ड क्र. ३२ दयालनगर चांदीबाई गुरूदासमल लालवाणी यांचे घर, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील वसंतराव शंकरराव वैद्य यांचे घर या मालमत्ता सील करीत जप्तीची कार्यवाही केली. पथकात पथक प्रमुख रवींद्र जगताप, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, प्रदीप मुनघाटे, आशिष गायकवाड, चंदन महत्वाने आदींचा समावेश आहे.नगर पालिकेला १०० टक्के कर वसूल झाल्यास ५ कोटी रुपये मिळतात; पण नागरिक वेळेवर कर अदा करीत नाहीत. यामुळे यंदा १० कोटी रुपयांचा कर थकित झाला आहे. धडक कर वसुली मोहीम सातत्याने सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कर अदा केला पाहिजे.- रवींद्र जगताप, कर अधीक्षक, नगर परिषद, वर्धा.शहरातील विकास कामे करण्याकरिता तथा शासनाकडून निधी मिळविण्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे असते; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने विकास कामांत अडथळे येतात. नागरिकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा.