शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी वर्ध्यात झाला कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

कोविडला रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाला स्कोच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसांत आढळले १९२ कोरोना बाधित : आरोग्य विभागाची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा होत असताना शनिवारी जिल्ह्यात ४१ नवीन कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली होती. एकाच दिवशी तब्बल नवीन ४१ कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागाचीही तारांबळ उडाली होती.कोविडला रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाला स्कोच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील १५ दिवसांत तब्बल १९२ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी बहूतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.प्रायोगिक तत्त्वावर सात रुग्ण गृह अलगीकरणातकोरोनाचे अती सौम्य लक्षणे असलेली किंवा कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सध्या सात कोविड बाधितांना प्रायोगिक तत्त्वावर गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अ‍ॅन्टिजेन किट; ४,८०९ व्यक्तींची झाली चाचणीवर्धा जिल्हा प्रशासनाला २१ हजार अ‍ॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यानंतर ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन कोविड चाचणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत ४ हजार ८०९ व्यक्तींची कोविड चाचणी अ‍ॅन्टिजेन किटद्वारे करण्यात आली असून त्यापैकी १८८ व्यक्ती कोविड बाधित असल्याचे निदान झाले आहे. एकूणच सध्या अ‍ॅन्टिजन किटद्वारे कोविड चाचणी केल्यावर झटपट अहवाल प्राप्त होत असल्याने ही किट सध्या ही किट वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे.२,६६९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत एकूण २ हजार ८९० व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ६६९ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९२ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात कोविड चाचणीला दिली जातेय गतीकोराना संकट आणि पावसाळ्याचे एकत्रित आल्याने सध्या आरोग्य विभागावर नागरिकांच्या निरोगी आरोग्या विषयीचा दुहेरी ताण आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाकडून कोविड चाचणीला गती दिली जात आहे. कोविड चाचणी जास्त होत असल्याने रुग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.२८६ व्यक्तींचा कोरोनावर विजयजिल्ह्यात आतापर्यंत ४०३ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असली तरी त्यापैकी २८६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने नऊ व्यक्तींचा बळी घेतला असून एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सध्या जिल्ह्यात १०७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून आज १५ व्यक्तींना कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.कोविड चाचण्या वाढविल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. शनिवार स्वातंत्र्यदिनी एकूण ४१ व्यक्तींचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या