शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

डबघाईस आलेल्या सहकारी बँका शिखर बँकेत विलीन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:29 IST

कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच विदर्भातील तीन बँकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.राज्यात वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्हा सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आहे. या बँकांमधील आर्थिक व्यवहार बंद झाले असून सर्वसामान्य शेतकरी, नौकरदार यांचे पैसे यात अडकून पडले आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २ लाख २० हजार खातेदारांचे ३२५ कोटी रूपये अडकून पडले आहेत. सदर बँकेला केंद्र सरकारने आर्थिक मदत केली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तीनही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला आहे. परंतु या बँकांकडून झालेल्या कर्जवाटपाची वसुली झालेली नाही. राज्य सरकारने कर्जमाफी दिली असल्यामुळे ही रक्कम धरून वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरळीत होण्यासाठी १०० कोटी रूपयाची गरज आहे. ही बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी वर्धेचे भाजप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सातत्याने लावून धरली आहे. गेल्या दोन अधिवेशनात त्यांनी या संदर्भात लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लक्ष घातले व ३ आॅक्टोबरला मुंबई येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविला. त्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली व वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. गुरूवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना त्यांनी वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. व याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.खातेदाराची रक्कम सुरक्षीत राहावी यासाठी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन दरबारी हा प्रश्न लावून धरण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंगी येथील शासकीय कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. हा निर्णय लवकरच होईल व जिल्हा सहकारी बँकेत पैसे अडकून पडलेल्या सर्व सामान्य लोकांना दिला मिळेल, असा मला विश्वास आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस