शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

डबघाईस आलेल्या सहकारी बँका शिखर बँकेत विलीन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:29 IST

कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच विदर्भातील तीन बँकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्ज वाटपातील आर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभार यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.राज्यात वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्हा सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आहे. या बँकांमधील आर्थिक व्यवहार बंद झाले असून सर्वसामान्य शेतकरी, नौकरदार यांचे पैसे यात अडकून पडले आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २ लाख २० हजार खातेदारांचे ३२५ कोटी रूपये अडकून पडले आहेत. सदर बँकेला केंद्र सरकारने आर्थिक मदत केली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तीनही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला आहे. परंतु या बँकांकडून झालेल्या कर्जवाटपाची वसुली झालेली नाही. राज्य सरकारने कर्जमाफी दिली असल्यामुळे ही रक्कम धरून वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरळीत होण्यासाठी १०० कोटी रूपयाची गरज आहे. ही बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी वर्धेचे भाजप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सातत्याने लावून धरली आहे. गेल्या दोन अधिवेशनात त्यांनी या संदर्भात लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लक्ष घातले व ३ आॅक्टोबरला मुंबई येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविला. त्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली व वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करावी, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. गुरूवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना त्यांनी वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. व याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.खातेदाराची रक्कम सुरक्षीत राहावी यासाठी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन दरबारी हा प्रश्न लावून धरण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंगी येथील शासकीय कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. हा निर्णय लवकरच होईल व जिल्हा सहकारी बँकेत पैसे अडकून पडलेल्या सर्व सामान्य लोकांना दिला मिळेल, असा मला विश्वास आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस