शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

खादी व ग्रामोद्योगाला सहकार्य करणार

By admin | Updated: April 27, 2015 01:33 IST

खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन ...

वर्धा : खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वर्धेत केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित खादी व ग्रामोद्योग मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात उद्घाटनपर मार्गदर्शन करताना ते रविवारी बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. पी.बी. काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रमचे सचिव श्रीराम जाधव, खादी आयोगाचे सेवानिवृत्त संचालक आर.एस.बैंदूर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, बलुतेदार संस्थेचे अध्यक्ष अदनाने उपस्थित होते. राज्यमंत्री पोटे म्हणाले, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला पुनर्जिवित करावयाचे आहे. या मंडळामध्ये उभारी घेण्याची खूप क्षमता आहे. मंडळाच्या सर्व समस्यांवर सर्वोतोपरी विचार करून लवकरच या संदर्भात राज्यस्तरीय बैठकही घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकोप्याने, जिद्दीने सर्वांना पुढे येऊन नवीन पिढी उत्तमोत्तम घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन बदल घडवून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठीही कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उद्योजकांनीही स्पर्धेची जाणीव ठेऊन आजच्या बाजारात आवश्यक असणाऱ्या बाबींवरही बारकाईने अभ्यास करून दर्जेदार पॅकिंग, मार्केटींग यावरही लक्ष केंद्रीत करावे, असेही ते म्हणाले. संचालक काळे म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था आपल्या उत्पादनाच्या दर्जाची गुणवत्ता तपासून उत्पादनाचे प्रमाणन करते. त्या संबंधित प्रमाणपत्रही देते. याचा सर्व उद्योजकांनी लाभ घ्यावा. लहान-लहान उद्योजकांनीही या संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. राज्यातील उत्पादन स्पर्धेचाही बारकाईने अभ्यास करून उत्पादनाचा दर्जा तांत्रिक पद्धतीनेही विकसित करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सेवाग्राम आश्रमचे सचिव जाधव म्हणाले, प्रत्येकाने खादीचा वापर करणे आवश्यक आहे. खादी हे कापड नसून तो एक विचार आहे, हे प्रत्येकाचे अंगी भिनले पाहिजे. महात्मा गांधी यांचे विचार जगाला प्रेरक आहेत. त्यांचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आचरणातून त्यांचा विचार पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन आयोजन समितीचे मुख्य संयोजक प्रदीप चेचरे यांनी मंडळाची सद्यस्थिती, अडचणी व उपाययोजना याबाबत सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश सुरुंग यांनी मानले. यावेळी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)