शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

खादी व ग्रामोद्योगाला सहकार्य करणार

By admin | Updated: April 27, 2015 01:33 IST

खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन ...

वर्धा : खादी व ग्रामोद्योग मंडळाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असून मंडळाला संपूर्ण पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वर्धेत केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित खादी व ग्रामोद्योग मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात उद्घाटनपर मार्गदर्शन करताना ते रविवारी बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. पी.बी. काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रमचे सचिव श्रीराम जाधव, खादी आयोगाचे सेवानिवृत्त संचालक आर.एस.बैंदूर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, बलुतेदार संस्थेचे अध्यक्ष अदनाने उपस्थित होते. राज्यमंत्री पोटे म्हणाले, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला पुनर्जिवित करावयाचे आहे. या मंडळामध्ये उभारी घेण्याची खूप क्षमता आहे. मंडळाच्या सर्व समस्यांवर सर्वोतोपरी विचार करून लवकरच या संदर्भात राज्यस्तरीय बैठकही घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकोप्याने, जिद्दीने सर्वांना पुढे येऊन नवीन पिढी उत्तमोत्तम घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन बदल घडवून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठीही कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उद्योजकांनीही स्पर्धेची जाणीव ठेऊन आजच्या बाजारात आवश्यक असणाऱ्या बाबींवरही बारकाईने अभ्यास करून दर्जेदार पॅकिंग, मार्केटींग यावरही लक्ष केंद्रीत करावे, असेही ते म्हणाले. संचालक काळे म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था आपल्या उत्पादनाच्या दर्जाची गुणवत्ता तपासून उत्पादनाचे प्रमाणन करते. त्या संबंधित प्रमाणपत्रही देते. याचा सर्व उद्योजकांनी लाभ घ्यावा. लहान-लहान उद्योजकांनीही या संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. राज्यातील उत्पादन स्पर्धेचाही बारकाईने अभ्यास करून उत्पादनाचा दर्जा तांत्रिक पद्धतीनेही विकसित करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सेवाग्राम आश्रमचे सचिव जाधव म्हणाले, प्रत्येकाने खादीचा वापर करणे आवश्यक आहे. खादी हे कापड नसून तो एक विचार आहे, हे प्रत्येकाचे अंगी भिनले पाहिजे. महात्मा गांधी यांचे विचार जगाला प्रेरक आहेत. त्यांचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आचरणातून त्यांचा विचार पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन आयोजन समितीचे मुख्य संयोजक प्रदीप चेचरे यांनी मंडळाची सद्यस्थिती, अडचणी व उपाययोजना याबाबत सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश सुरुंग यांनी मानले. यावेळी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)