शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:54 IST

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाच्या शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतमालाच्या किमती मात्र स्थिर आहेत. शेतीला लागणाऱ्या निविष्ठांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे.खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पॉस मशीनचा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी चोरीला आळा बसला; मात्र दुसरीकडे खतांचे दर वाढविले आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांच्या किंमतीत वाढ केली आहे.वर्धा जिल्ह्यात कापूस शेतीचे मोठे क्षेत्र असते. खताच्या एका बॅग मागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने प्रती एकरी एक ते दोन हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सरकारने दिलासा देण्याऐवजी खतांची दरवाढ केल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे.१०.२६.२६ या खताची ५० किलोची बॅग १२३५ रुपयांत मिळायची, ती आता १३४० रुपये किमतीची घ्यावी लागणार आहे. १०५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. डीएपीच्या बॅगचे ११० रुपयांनी भाव वाढले आहे. १२.३२.१६ खताची बॅग १२४० रुपयींची होती. यात ११० रुपयाची वाढ झाली आहे.तर पोटॅश बॅगची २०० रुपयांनी किंमत वाढून ९०० रुपये झाले आहे. अन्य खतांच्या किंमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणून शेतकयांना दिलासा द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. काशीकर, राकेश पांडे, अमोल गेडाम, शुभम जळगावकर, मनीष भुजाडे, सागर घोडे, अक्षय पटेल, रोहित बैस, प्रेम मडावी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.नियोजन कोलमडण्याची भीतीतीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवत आहेत. यंदाही दुष्काळी परिस्थिती आहे. रासायनिक खतांच्या भडकलेल्या किंमतींमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. खरीप हंगामावरच शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो. रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे नियोजन कोलमडून हाही हंगाम हातून जातो की काय, अशी भीती यावेळी शेतकºयांनी व्यक्त केली.