शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

देयकाकरिता कंत्राटदाराने लावला गळफास

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला.

चिठ्ठीही सापडली : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंगणघाट : बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र अवचट (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड असे या कत्राटदाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र अवचट बांधकाम कंत्राटदार होते. त्यांनी एका खासगी कंपनीचा डांबर गुफीलींगचा लेबर कंत्राट घेतला होता. यात काम केल्यानंतर कामाचे देयक कंपनीला सादर केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ते देण्यास टाळाटाळ केली. अखेर कामाचे देयक देण्याचे नाकारले. या कंत्राटी कामासाठी जवळच्या नातेवाईकाकडून उसनवार घेवून एक २०७ वाहन व डांबराचे यंत्र खरेदी केले होते. घेतलेले पैसे परत करायचे असताना थकित देयकाकरिता नकार मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली. अशा स्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे देत नाही काय करायचे ते करून घे असे म्हटल्याचे मृतकाने मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या चिठ्ठीत त्या अधिकाऱ्यांची नावेही आहेत. या अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्यावर कारवाई करीत थकित देयकाची रक्कम परिवाराला देण्याचे व गोविंद सर यांना शिक्षा देण्याचे लिहून ठेवले आहे.मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृतक व त्यांची पत्नी झोपून उठले. यावेळी नित्याप्रमाणे त्यांची पत्नी फिरायला गेली. त्या ७ वाजताच्या दरम्यान घरी परत आल्या असता त्यांना राजेंद्रचा मृतदेह पंख्याला नायलॉन दोरीने फासी लागून दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी मृतकाच्या खिशातून एक चिठ्ठी ताब्यात घेतली.यासंदर्भात मृतकाचा मुलगा प्रणय राजेंद्र अवचट यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतक राजेंद्र अवचट यांचा मुलगा प्रणय बुटीबोरी येथे अभियंता असून मुलगी नागपूरला अभियंता म्हणून नोकरीला आहे. अवचट यांच्या आत्महत्येने कंत्राटदार वर्गात विविध चर्चा सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी) मृत कंत्राटदाराच्या चिठ्ठीत अधिकाऱ्यांची नावे मृतक राजेंद्र यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्रास देणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची नावे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. शिवाय त्यात ही कंपनी एका मंत्र्याची असून ती दुसऱ्याच्या नावाने सुरू असल्याचे लिहिले आहे. यात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतकाच्या खिशात असलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यात उल्लेख असलेल्या संबंधीतांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रारंभी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. काय ते सत्य तपासाअंती समोर येईलच.- मोतीराम बोडखे, ठाणेदार, हिंगणघाट