शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

देयकाकरिता कंत्राटदाराने लावला गळफास

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला.

चिठ्ठीही सापडली : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंगणघाट : बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र अवचट (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड असे या कत्राटदाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र अवचट बांधकाम कंत्राटदार होते. त्यांनी एका खासगी कंपनीचा डांबर गुफीलींगचा लेबर कंत्राट घेतला होता. यात काम केल्यानंतर कामाचे देयक कंपनीला सादर केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ते देण्यास टाळाटाळ केली. अखेर कामाचे देयक देण्याचे नाकारले. या कंत्राटी कामासाठी जवळच्या नातेवाईकाकडून उसनवार घेवून एक २०७ वाहन व डांबराचे यंत्र खरेदी केले होते. घेतलेले पैसे परत करायचे असताना थकित देयकाकरिता नकार मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली. अशा स्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे देत नाही काय करायचे ते करून घे असे म्हटल्याचे मृतकाने मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या चिठ्ठीत त्या अधिकाऱ्यांची नावेही आहेत. या अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्यावर कारवाई करीत थकित देयकाची रक्कम परिवाराला देण्याचे व गोविंद सर यांना शिक्षा देण्याचे लिहून ठेवले आहे.मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृतक व त्यांची पत्नी झोपून उठले. यावेळी नित्याप्रमाणे त्यांची पत्नी फिरायला गेली. त्या ७ वाजताच्या दरम्यान घरी परत आल्या असता त्यांना राजेंद्रचा मृतदेह पंख्याला नायलॉन दोरीने फासी लागून दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी मृतकाच्या खिशातून एक चिठ्ठी ताब्यात घेतली.यासंदर्भात मृतकाचा मुलगा प्रणय राजेंद्र अवचट यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतक राजेंद्र अवचट यांचा मुलगा प्रणय बुटीबोरी येथे अभियंता असून मुलगी नागपूरला अभियंता म्हणून नोकरीला आहे. अवचट यांच्या आत्महत्येने कंत्राटदार वर्गात विविध चर्चा सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी) मृत कंत्राटदाराच्या चिठ्ठीत अधिकाऱ्यांची नावे मृतक राजेंद्र यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्रास देणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची नावे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. शिवाय त्यात ही कंपनी एका मंत्र्याची असून ती दुसऱ्याच्या नावाने सुरू असल्याचे लिहिले आहे. यात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतकाच्या खिशात असलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यात उल्लेख असलेल्या संबंधीतांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रारंभी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. काय ते सत्य तपासाअंती समोर येईलच.- मोतीराम बोडखे, ठाणेदार, हिंगणघाट