शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:03 IST

अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते.

ठळक मुद्देमासिक सभेवर बहिष्कार : प्रशासनाला दिली संपाची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते. ते आश्वासन पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. वर्धेत याचा शुभारंभ हिंगणघाट येथील बैठकीवर बहिष्कार टाकून करण्यात आला.विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात मानधन वाढ करण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी कर्मचाºयांच्या दिले होते. राज्यातील प्रमुख सात संघटनेच्या कृती समितीने शासनाने गठीत केलेल्या कमेटीला आपला अहवाल ७ जून रोजी सादर केला. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून मानधन वाढीचे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी असहकार आंदोलन सुरु केले असून कुठल्याही शासकीय बैठकीत सहभागी होणार नाही. शिवाय त्या मासिक अहवालही देणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबर पासून दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावार जातील अशी नोटीस त्यांनी दिली आहे.वर्धा जिल्ह्यातील २,२०० कर्मचाºयांनी २२ आँगस्ट पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. समुद्रपूर व हिंगणघाट प्रकल्प अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तर बैठकीवर बहिष्कार करीत मासिक अहवाल देणार नाही, असे लिखीत दिले आहे. बिट व पीएचसी स्तरावरील बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ७०० महिलांना जून महिन्याचे मानधन मिळाले नाही. आँनलाईन मानधनाच्या चुकीच्या धोरणामुळे कमी मानधन खात्यात जमा करण्यात आले आहे. सर्व प्रकल्प कार्यालयातील लिपीक व अधिकारी यांना पीएफएमएस बाबत प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी आयटक नेते दिलीप उटाणे यांनी आयुक्त एकात्मीक बाल विकास सेवा योजना मुंबई यांच्या कडे केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्ञानेश्वरी डंबारे, मंगला इंगोले, सुनंदा आखाडे, वंदना खोबरागडे, मैना उईके, रेखा काचोळे, रंजना तांबेकर, सुरेखा रोहनकर, माला भगत यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी केली आहे.