शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

अल्लीपूर येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, शुद्ध पाण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मागील अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरण योजनेसाठी लाखो रूपये खर्चूनही गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणारे फिल्टर खराब झाले असून तेही बदलविल्या जात नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राथमीक आरोग्य केंन्द अल्लीपुर डॉ . ज्योती मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे विषमजोर, पोटाचे आजार, सर्दी, खोकला आदी आजारांच्या साथीचा गावात फैलाव होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.गावाला शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नगावातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात सरपंच नितीन चंदनखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जि.प.च्या मासिक सभेत दूषित पाणीपुरवठ्याचा विषय ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतची चौकशी केली असून गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणाीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण