शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्लीपूर येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, शुद्ध पाण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मागील अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरण योजनेसाठी लाखो रूपये खर्चूनही गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणारे फिल्टर खराब झाले असून तेही बदलविल्या जात नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राथमीक आरोग्य केंन्द अल्लीपुर डॉ . ज्योती मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे विषमजोर, पोटाचे आजार, सर्दी, खोकला आदी आजारांच्या साथीचा गावात फैलाव होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.गावाला शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नगावातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात सरपंच नितीन चंदनखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जि.प.च्या मासिक सभेत दूषित पाणीपुरवठ्याचा विषय ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतची चौकशी केली असून गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणाीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण