शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

अल्लीपूर येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, शुद्ध पाण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मागील अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरण योजनेसाठी लाखो रूपये खर्चूनही गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणारे फिल्टर खराब झाले असून तेही बदलविल्या जात नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राथमीक आरोग्य केंन्द अल्लीपुर डॉ . ज्योती मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे विषमजोर, पोटाचे आजार, सर्दी, खोकला आदी आजारांच्या साथीचा गावात फैलाव होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.गावाला शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नगावातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात सरपंच नितीन चंदनखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जि.प.च्या मासिक सभेत दूषित पाणीपुरवठ्याचा विषय ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतची चौकशी केली असून गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणाीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण