शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगण्या पुलामुळे तुटतो सावंगी-देर्डा गावाचा संपर्क

By admin | Updated: August 1, 2016 00:27 IST

सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे;

नेहमीच होते वाहतूक ठप्प : उंची वाढविण्याची मागणी धुळखात सेवाग्राम : सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे; मात्र हा पूल आता ठेंगणा पडत असून पावसाळ्यात त्यावरून पाणी जाणे नित्याचेच झाले आहे. पुलावरून पाणी वाहत असताना या दोन गावांचा संपर्क तुटतो. यामुळे सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करण्यात आली असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. हमदापूर ते मांडगाव या मार्गावर अनेक गावे आहेत. यातील सावंगी व देर्डा या दोन गावाच्या मधून बोर व धाम नदी वाहत आहे. याच गावातील पुलाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. या संगमामुळे नदीचे पात्र विस्तारले आहे. या विस्तारीत पत्रावर मोठ्या पुलाची गरज असताना इथे ढोल्यांच्या रपट्याप्रमाणे पूल बनविण्यात आलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी नेहमीच पुलावरून वाहते. यामुळे नदीला पूर येताच दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. जुलै महिन्यात या नदीला तीनवेळा पूर आला. तिनही वेळा या पुरामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. गुरुवारी सायंकाळी या पुराचे पाणी ओसरल्याने आवागमन सुरू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. हमदापूर ते सावंगी या दरम्यान जेजूरी, बावापूर, आपटा, खुणी, नंदपूर आदी गावे आहेत. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता व नागरिकांना बाजारासाठी हमदापूर येथे यावे लागत आहे; मात्र या नदीला असलेल्या पुरामुळे या गावातील नागरिकांना गावातून बाहेर येणे व बाहेरून गावात जाणे कठीण होत आहे. या त्रासापासून बचावाकरिता या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीला बराच काळ झाला तरी याकडे शासनाचे मात्र कायम दुर्लक्ष आहे.(वार्ताहर) आष्टा-नांद्राचीही तीच समस्या हमदापूरच्या पुढे आष्टा व नांद्रा ही दोन गावे असून मधून बोर नदी वाहते. या दोन्ही गावांना जोडणारा सिमेंट रपटा नदीमधून असून नदी ते नांद्रा गावापर्यंतचे १५० मी. चे अंतर आहे. नांद्रा ते नदी यामध्ये फक्त ७५ मीटरचा सिमेंट रस्ता बनविण्यात आला आणि उर्वरीत मात्र कच्चा रस्ता आहे. दोन्ही गावाचा शाळा, बाजार, आरोग्य व अधिकोषसाठी हमदापूर या गावाशी संबंध असून नांद्रा वासीयांना आता तर पिंपळगाव मार्गे हमदापूर व वर्धा गाठावे लागते. नदीवरील रपटा नेहमीच पाण्याखाली असल्याने जाणे येणे बंद आहे. या समस्येमुळे गावकरी त्रस्त असून संकटसमयी लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रस्ताव पाठविला आहे. पुलाची उंची रपट्यासारखी असल्याने पावसाळ्यात मात्र आवागमन बंद राहते. उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असल्याचे नांद्रा येथील सरपंच संदीप लांबट यांनी सांगितले.