शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी

वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून वर्धेतील भाजीपाला गत महिन्यापासून नागपूर येथील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. याकरिता वर्धा जिल्ह्यातील अभिनव शेतकरी गटाला वाहन देण्यात आले आहे. या वाहनातून गटाशी संबंधीत असलेल्या शेतकऱ्यांची भाजी घेवून एक शेतकरी नागपूर येथे जावून ती थेट विकत आहे. यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे गटाचे शेतकरी विवेक वाघ यांनी सांगितले. नागरिकांना शेतातून निघालेली ताजी भाजी मिळत असल्याने भाजीचे हे वाहन दिसताच येथे गर्दी होते. शिवाय नागरिकांची आर्थिक बचतही होत आहे.हिच पद्धत वर्धेत सुरू करण्यात येत आहे. याची माहिती भाजीउत्पादक शेतकऱ्यांना देण्याकरिता येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांना वाहनाची व यातून सुरू असलेल्या भाजी विक्रीची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. बऱ्हाटे यांनी दिली. यातून शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)