शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी

वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून वर्धेतील भाजीपाला गत महिन्यापासून नागपूर येथील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. याकरिता वर्धा जिल्ह्यातील अभिनव शेतकरी गटाला वाहन देण्यात आले आहे. या वाहनातून गटाशी संबंधीत असलेल्या शेतकऱ्यांची भाजी घेवून एक शेतकरी नागपूर येथे जावून ती थेट विकत आहे. यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे गटाचे शेतकरी विवेक वाघ यांनी सांगितले. नागरिकांना शेतातून निघालेली ताजी भाजी मिळत असल्याने भाजीचे हे वाहन दिसताच येथे गर्दी होते. शिवाय नागरिकांची आर्थिक बचतही होत आहे.हिच पद्धत वर्धेत सुरू करण्यात येत आहे. याची माहिती भाजीउत्पादक शेतकऱ्यांना देण्याकरिता येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांना वाहनाची व यातून सुरू असलेल्या भाजी विक्रीची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. बऱ्हाटे यांनी दिली. यातून शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)