शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: March 26, 2015 01:49 IST

शासनाने इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध सुविधा जाहीर केल्या. मात्र त्याचा थेट लाभ कामगारांना मिळत नसल्याने ते आजही या लाभापासून वंचित आहेत.

वर्धा : शासनाने इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध सुविधा जाहीर केल्या. मात्र त्याचा थेट लाभ कामगारांना मिळत नसल्याने ते आजही या लाभापासून वंचित आहेत. ही लाभाची प्रकरणे कामगार अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असून त्वरित निकाली निघाली काढावीत तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुविधा कामगारांना प्रदान कराव्यात, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. स्थानिक विठ्ठल मंदिर येथून प्रारंभ झालेल्या मोर्चात शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले होते. सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स संघटनेच्या अंतर्गत इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळातील सदस्यांनी निदर्शने केली. यावेळी केलेल्या मागण्यात ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत नोंदणी केलेल्या उर्वरित कामगारांना ३ हजार रूपयापर्यंत साहित्य खरेदी अनुदान मिळावे, कामगारांचे प्रसुती अनुदानाची प्रकरणे त्वरित निकाली काढावी, कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृती प्रकरणे प्रलंबीत असल्याने शिक्षण पूर्ण करण्यास अडथळा येतो, अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांना २ लाख व अंत्यविधीसाठी पाच हजार रूपये अनुदान अदा करावे, क्षयरोग, कॅन्सर, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारात कामगरांना २५ हजार रूपये अनुदान दिले जावे, घरकुल योजनेकरिता घरबांधणी २ लाख रूपये तर घरदुरूस्तीसाठी दीड लाखाची असलेली योजना राज्य शासनाने त्वरित मंजूर करावी, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे टॅबलेट, लॅपटॉप देण्यात यावा, वाढत्या महागाईप्रमाणे मजूर, मिस्त्री, कुली आदीची मजुरीत वाढ करावी, यासह बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलीच्या विवाहाकरिता प्रत्येकी ५१ हजार रूपये अनुदान देण्यात यावे, नोंदणी केलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना दरमहा एक हजार रूपये निवृत्तीवेतन देण्यात यावे या अकरा मागण्यांचा समावेश होता. मोर्चात यशवंत झाडे, महेश दुबे, विनोद तडस, भैय्या देशकर यासह कामगार सहभागी होते.(स्थानिक प्रतिनिधी)शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शून्यइमारतीचे बांधकाम करणाऱ्या मजूर, मिस्त्री, कुली, सेंट्रींगवाले या कामगारांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. शासनाने यांच्याकरिता सुविधांची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने या कामगारांना अल्प मोबदल्यात अधिक मेहनीचे काम करावे लागत आहेत.