शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नव्या जिल्ह्यांची निर्मिती अडचणीत; वित्त विभागाकडून अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:25 IST

विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती थांबलेली आहे.

ठळक मुद्देअहेरी, काटोल, पुसद, चिमूर जिल्ह्याच्या प्रतीक्षेत

अभिनव खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्यात येतील, अशी या भागातील नागरिकांना आशा आहे. मात्र विदर्भ राज्याची मागणी रखडल्याने नवीन जिल्हा निर्मितीचे काम ही खोळंबले आहे.१९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी मध्यप्रदेश प्रांतात असलेल्या विदर्भाला महाराष्ट्रात विलीन करण्यात आले. व नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अनेक आंदोलने झाले. भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु आता विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही भूमिका बदलविली आहे.त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती थांबलेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद, गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर तर नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून काटोल हा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने या प्रस्तावावर सहमती दर्शविली असली तरी वित्त विभागाने मात्र काही वर्षांपूर्वी याबाबत प्रतिकूल मत दर्शविले आहे. अलिकडेच महसूल मंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे सुतोवाच केले होते.या पार्श्वभूमीवर विदर्भातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागणीला पुन्हा जोर चढला आहे. यापूर्वी अशा मागण्या आल्यानंतर शासनाने यापैकी काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करून जनमत दाबून धरण्याचा प्रयत्न केला. आता मात्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने विदर्भातील या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचे काम रखडलेले आहे.

टॅग्स :Governmentसरकार