शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

राज्यातील नव्या जिल्ह्यांची निर्मिती अडचणीत; वित्त विभागाकडून अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:25 IST

विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती थांबलेली आहे.

ठळक मुद्देअहेरी, काटोल, पुसद, चिमूर जिल्ह्याच्या प्रतीक्षेत

अभिनव खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्यात येतील, अशी या भागातील नागरिकांना आशा आहे. मात्र विदर्भ राज्याची मागणी रखडल्याने नवीन जिल्हा निर्मितीचे काम ही खोळंबले आहे.१९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी मध्यप्रदेश प्रांतात असलेल्या विदर्भाला महाराष्ट्रात विलीन करण्यात आले. व नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अनेक आंदोलने झाले. भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु आता विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही भूमिका बदलविली आहे.त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती थांबलेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद, गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर तर नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून काटोल हा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने या प्रस्तावावर सहमती दर्शविली असली तरी वित्त विभागाने मात्र काही वर्षांपूर्वी याबाबत प्रतिकूल मत दर्शविले आहे. अलिकडेच महसूल मंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे सुतोवाच केले होते.या पार्श्वभूमीवर विदर्भातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागणीला पुन्हा जोर चढला आहे. यापूर्वी अशा मागण्या आल्यानंतर शासनाने यापैकी काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करून जनमत दाबून धरण्याचा प्रयत्न केला. आता मात्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने विदर्भातील या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचे काम रखडलेले आहे.

टॅग्स :Governmentसरकार