शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मिला दगडी किल्ला

By admin | Updated: October 25, 2015 02:07 IST

महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

उपक्रम : विद्यार्थ्यांनी जाणले किल्ल्याचे महत्त्व, किल्ले रक्षणार्थ पुढाकार घेण्याचा निर्धारवर्धा : महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांनी किल्ल्यांच्या रक्षणार्थ पुढाकार घ्यावा यासाठी किल्ले तयार करण्याचा उपक्रम शैक्षणिक उपक्रम कार्यानुभव विषयांतर्गत नंदोरी येथील जि. प. शाळेत राबविण्यात आला. येथील शिक्षक अनिल कानकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यापासून किल्ले बनवून घेतले. यासाठी लागणारे साहित्य मुलांकडूनच गोळा करून त्यानुसार त्याची तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातील छोटे-मोठे दगड गोळा करून मुरमी दगड, चुनखडक, माती, मुरूम, दगड आंदीविषयी माहिती व त्यांचे गुणधर्म जाणून घेत त्यानुसार किल्ला तयार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निरनिराळे दगड व मुरुम मातीची ओळख झाली. तसेच यामुळे परिसराची स्वच्छता जोपासण्यासही मदत झाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेला किल्ला सध्या गावात कौतुकाचा विषय ठरला. पालकांनीही शाळेत येऊन आपल्या पाल्यांनी तयार केलेला किल्ला पाहून समाधान व्यक्त केले. या उपक्रमात शाळेचे शिक्षक आर. एस. काळमेघ व दुष्यंत चौके यांनीही विद्यार्थ्यांना किल्ला निर्मितीत सहकार्य केले. शाळा समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी, केंद्रप्रमुख एन. एम. गिरडे व मुख्याध्यापक के.पी. शेळकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केले.(शहर प्रतिनिधी)