शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मिला दगडी किल्ला

By admin | Updated: October 25, 2015 02:07 IST

महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

उपक्रम : विद्यार्थ्यांनी जाणले किल्ल्याचे महत्त्व, किल्ले रक्षणार्थ पुढाकार घेण्याचा निर्धारवर्धा : महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांनी किल्ल्यांच्या रक्षणार्थ पुढाकार घ्यावा यासाठी किल्ले तयार करण्याचा उपक्रम शैक्षणिक उपक्रम कार्यानुभव विषयांतर्गत नंदोरी येथील जि. प. शाळेत राबविण्यात आला. येथील शिक्षक अनिल कानकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यापासून किल्ले बनवून घेतले. यासाठी लागणारे साहित्य मुलांकडूनच गोळा करून त्यानुसार त्याची तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातील छोटे-मोठे दगड गोळा करून मुरमी दगड, चुनखडक, माती, मुरूम, दगड आंदीविषयी माहिती व त्यांचे गुणधर्म जाणून घेत त्यानुसार किल्ला तयार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निरनिराळे दगड व मुरुम मातीची ओळख झाली. तसेच यामुळे परिसराची स्वच्छता जोपासण्यासही मदत झाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेला किल्ला सध्या गावात कौतुकाचा विषय ठरला. पालकांनीही शाळेत येऊन आपल्या पाल्यांनी तयार केलेला किल्ला पाहून समाधान व्यक्त केले. या उपक्रमात शाळेचे शिक्षक आर. एस. काळमेघ व दुष्यंत चौके यांनीही विद्यार्थ्यांना किल्ला निर्मितीत सहकार्य केले. शाळा समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी, केंद्रप्रमुख एन. एम. गिरडे व मुख्याध्यापक के.पी. शेळकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केले.(शहर प्रतिनिधी)