शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार तिमांडे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराच्या मध्य भागातून वर्धा नदीवर आजनसरा नॅशनल हायवे क्रमांक ७ नागपूर-हैदराबाद मार्ग जात असून संविधान चौक (कलोडे मंगल कार्यालय) ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. वर्धा नदीवर आजनसरा, रोहिणी घाट, जागजई घाट, दापोली घाट, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे, वर्धा नदीवर हिवरा, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे. तसेच वणा नदीवर लाडकी  ते नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम, पोथरा नदीवर काजळसरा ते मुरदगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करावे आदी मागण्यांचे निवेदन माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन  दिले. नागपूर - हैदराबाद महामार्ग क्रमांक ७ हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जातो. या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या, जड वाहने २४ तास चालतात. संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालय या भागात लोकांना चौकातून येणे-जाणे करावे लागते. भरधाव वाहनामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून, लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सातवर संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्राच्या सी. आर. एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. आजनसरा या गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेतीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात दापोरी, रोहिणी व जागजई या भागात आहे. वर्धा नदीवर वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. भक्तांना ये-जा करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करण्यासाठी वर्धा नदीच्या दापोरी घाट, रोहिणी घाट व जगजई घाट यापैकी कोणत्याही एका घाटावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भक्तांना ३० ते ४० किलोमीटरचा फेरा वाचू शकतो. वर्धा नदीवरील हिवरा ते धानोरा या नदीपात्राच्या महामार्गावर शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना नदीच्या पात्रातून वहिवाट करावी लागते. नदीला पूर आल्यास अलीकडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात खंड पडतो. परिणामी या सर्व शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaju Timandeराजू तिमांडे