शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार तिमांडे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराच्या मध्य भागातून वर्धा नदीवर आजनसरा नॅशनल हायवे क्रमांक ७ नागपूर-हैदराबाद मार्ग जात असून संविधान चौक (कलोडे मंगल कार्यालय) ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. वर्धा नदीवर आजनसरा, रोहिणी घाट, जागजई घाट, दापोली घाट, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे, वर्धा नदीवर हिवरा, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे. तसेच वणा नदीवर लाडकी  ते नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम, पोथरा नदीवर काजळसरा ते मुरदगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करावे आदी मागण्यांचे निवेदन माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन  दिले. नागपूर - हैदराबाद महामार्ग क्रमांक ७ हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जातो. या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या, जड वाहने २४ तास चालतात. संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालय या भागात लोकांना चौकातून येणे-जाणे करावे लागते. भरधाव वाहनामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून, लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सातवर संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्राच्या सी. आर. एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. आजनसरा या गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेतीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात दापोरी, रोहिणी व जागजई या भागात आहे. वर्धा नदीवर वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. भक्तांना ये-जा करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करण्यासाठी वर्धा नदीच्या दापोरी घाट, रोहिणी घाट व जगजई घाट यापैकी कोणत्याही एका घाटावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भक्तांना ३० ते ४० किलोमीटरचा फेरा वाचू शकतो. वर्धा नदीवरील हिवरा ते धानोरा या नदीपात्राच्या महामार्गावर शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना नदीच्या पात्रातून वहिवाट करावी लागते. नदीला पूर आल्यास अलीकडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात खंड पडतो. परिणामी या सर्व शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaju Timandeराजू तिमांडे