शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

चौपदरी महामार्गाचे बांधकाम उठले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:35 IST

चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यता : यशोदा नदीजवळील अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.यशोदा नदीच्या पुलावरील चारपदरी रस्त्यावर ग्रामीण भागातील गिरोली, अडेगाव, अंदोरी व परिसरातील अनेक गावांची वाहतूक आहे. या भागातील वाहतूक चारपदरी रस्त्यावर उजव्या बाजूने न काढता चुकीच्या मार्गावर डाव्या बाजूने काढण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातून देवळीकडे भुयारी मार्गाने जाणारी वाहतूक तसेच वर्धा मार्गाने येणारी महामार्गाची वाहतूक एकाच बाजूने येत आहे. तसेच देवळीकडून भुयारी मार्गाने खोलगट भागातून येणारी वाहतूक व महामार्गाच्या उंच पुलावरून यवतमाळकडे जाणारी वाहतूक नकळत एकाच ठिकाणी येत आहे. या दोन्ही ठिकाणी ‘ब्लार्इंड’ची स्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांचा जीव भांड्यात पडला आहे. चारपदरी महामार्ग प्रशासन तसेच दिलीप बिल्डकॉनच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती ओढवली आहे.त्याचप्रमाणे रस्त्यावरील पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने यशोदा नदीच्या पुलाखालील भुयारी मार्गावर तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या मार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचून राहात असल्याने देवळी मार्गाने यवतमाळकडे जाणारी तसेच ग्रामीण भागातून देवळीकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देवळीवरून वर्ध्याला जाणारी वाहने ढाब्याजवळील उंच पुलाचे खालून अरूंद रस्त्याने काढण्यात आली आहे. वर्ध्याकडे जाणारी व देवळीकडे येणारी वाहतूक या एकाच मार्गावर काढण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्गावर वाहतूक खोळंबून दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागत आहे. रस्ते बांधकामादरम्यान तांत्रिक बाबी न हाताळल्याने या भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ते बांधकाम प्रशासनाने बौद्धिक स्तर उंचावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.रस्ते प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळसजिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. मात्र, सर्वच कामांत नियोजनाचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कामांचा दर्जाही विशेष नाही. तरीदेखील संबंधितांकडून डोळेझाक केली जात आहे. यात वाहनचालकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.