शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरी महामार्गाचे बांधकाम उठले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:35 IST

चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यता : यशोदा नदीजवळील अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधितांना अनेकदा सूचना करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.यशोदा नदीच्या पुलावरील चारपदरी रस्त्यावर ग्रामीण भागातील गिरोली, अडेगाव, अंदोरी व परिसरातील अनेक गावांची वाहतूक आहे. या भागातील वाहतूक चारपदरी रस्त्यावर उजव्या बाजूने न काढता चुकीच्या मार्गावर डाव्या बाजूने काढण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातून देवळीकडे भुयारी मार्गाने जाणारी वाहतूक तसेच वर्धा मार्गाने येणारी महामार्गाची वाहतूक एकाच बाजूने येत आहे. तसेच देवळीकडून भुयारी मार्गाने खोलगट भागातून येणारी वाहतूक व महामार्गाच्या उंच पुलावरून यवतमाळकडे जाणारी वाहतूक नकळत एकाच ठिकाणी येत आहे. या दोन्ही ठिकाणी ‘ब्लार्इंड’ची स्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांचा जीव भांड्यात पडला आहे. चारपदरी महामार्ग प्रशासन तसेच दिलीप बिल्डकॉनच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती ओढवली आहे.त्याचप्रमाणे रस्त्यावरील पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने यशोदा नदीच्या पुलाखालील भुयारी मार्गावर तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या मार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचून राहात असल्याने देवळी मार्गाने यवतमाळकडे जाणारी तसेच ग्रामीण भागातून देवळीकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देवळीवरून वर्ध्याला जाणारी वाहने ढाब्याजवळील उंच पुलाचे खालून अरूंद रस्त्याने काढण्यात आली आहे. वर्ध्याकडे जाणारी व देवळीकडे येणारी वाहतूक या एकाच मार्गावर काढण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्गावर वाहतूक खोळंबून दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागत आहे. रस्ते बांधकामादरम्यान तांत्रिक बाबी न हाताळल्याने या भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ते बांधकाम प्रशासनाने बौद्धिक स्तर उंचावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.रस्ते प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळसजिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. मात्र, सर्वच कामांत नियोजनाचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कामांचा दर्जाही विशेष नाही. तरीदेखील संबंधितांकडून डोळेझाक केली जात आहे. यात वाहनचालकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.