शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

By admin | Updated: July 13, 2017 00:58 IST

वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे.

सिरसोलीवासीयांना १९ वर्षांपासून प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदर पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. प्रत्यक्ष कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सिरसोली हे गाव आष्टी तालुक्यात तर निंबारनी गाव मोर्शी तालुक्यात येते. ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या काठावर असल्याने ये-जा करणे अदचणीचे होते. परिणामी प्रवाशांना १६ कि़मी. चे जादा अंतर कापावे लागते. आदर पुलाचे बांधकाम झाल्यास चांदूरबाजार, नेरपिंगळाई, राजूरवाडी, परतवाडा, लेहगाव, आष्टी, कारंजा व नागपूर रस्त्याचे अंतर ३० ते ३५ कि़मीने कमी होईल. या परिसरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे या पुलावरून ५ ते ६ मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरू होऊ शकते. परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल. दोन्ही गावांना जाणारी बससेवा सुरू होईल. तसेच गावकऱ्यांना कमी वेळेत ये-जा करता येईल. गेल्या १९ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. आजवर या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. सिरसोली गाव राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले. अशा प्रगतशील गावाला एकही पूल देऊअ नये ही शोकांतिकाच असे मत गावकरी व्यक्त करतात. राज्य शासनाने या गावांना जोडणारा पूल बांधुन दळणवळण सुरळीत करण्याची मागणी आहे.