शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

By admin | Updated: July 13, 2017 00:58 IST

वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे.

सिरसोलीवासीयांना १९ वर्षांपासून प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदर पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. प्रत्यक्ष कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सिरसोली हे गाव आष्टी तालुक्यात तर निंबारनी गाव मोर्शी तालुक्यात येते. ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या काठावर असल्याने ये-जा करणे अदचणीचे होते. परिणामी प्रवाशांना १६ कि़मी. चे जादा अंतर कापावे लागते. आदर पुलाचे बांधकाम झाल्यास चांदूरबाजार, नेरपिंगळाई, राजूरवाडी, परतवाडा, लेहगाव, आष्टी, कारंजा व नागपूर रस्त्याचे अंतर ३० ते ३५ कि़मीने कमी होईल. या परिसरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे या पुलावरून ५ ते ६ मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरू होऊ शकते. परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल. दोन्ही गावांना जाणारी बससेवा सुरू होईल. तसेच गावकऱ्यांना कमी वेळेत ये-जा करता येईल. गेल्या १९ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. आजवर या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. सिरसोली गाव राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले. अशा प्रगतशील गावाला एकही पूल देऊअ नये ही शोकांतिकाच असे मत गावकरी व्यक्त करतात. राज्य शासनाने या गावांना जोडणारा पूल बांधुन दळणवळण सुरळीत करण्याची मागणी आहे.