शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

केळकरवाडी चौकात गतिरोधक बसवा

By admin | Updated: February 12, 2016 02:43 IST

आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या मार्गावर एकही गतिरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे.

मागणी : भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वर्धा : आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या मार्गावर एकही गतिरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे भरधाव वाहने धावतात. या मार्गावर शाळा असल्याने वाहनांच्या गतिला आवर घालणे गरजेचे ठरते आहे. येथे किरकोळ अपघाताच्या घटना होतात. केरकळवाडी चौकात गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकारी, वर्धा नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले. आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून अरूंद असल्याने वाहतुकीला अडचणीचा ठरत होता. येथील नागरिकांनी वारंवार मागणी केल्यावर रस्ता रूंदीकरण करुन रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले. मात्र येथील चौकात गतिरोधक लावले नाही. या मार्गावर शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना रस्ता ओलांडून जावे लागते. रस्ता ओलांडत असताना वाहनांच्या गतीमुळे अपघाताचा धोका असतो. ३ फेब्रुवारीला झालेल्या घटनेत मोठी दुर्घटना टळली. गतिरोधक नसल्याने वाहन भरधाव येतात. केळकरवाडी चौकात चारही दिशेने वाहने येत असल्याने वाहनांच्या गतिमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहनांची दिवसरात्र ये-जा ल्राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. वर्धा-आर्वी मार्गावरील या केळकरवाडी चौकात गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. या मागणीचे निवेदन श्रीराम सिटीचे कर्मचारी वर्ग, पालक तसेच निरज इंगोले, हर्षल म्हस्के, सतीश तेलरांधे, संदीप पेटकर, अमोल राऊत व नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)