शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

केळकरवाडी चौकात गतिरोधक बसवा

By admin | Updated: February 12, 2016 02:43 IST

आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या मार्गावर एकही गतिरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे.

मागणी : भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वर्धा : आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या मार्गावर एकही गतिरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे भरधाव वाहने धावतात. या मार्गावर शाळा असल्याने वाहनांच्या गतिला आवर घालणे गरजेचे ठरते आहे. येथे किरकोळ अपघाताच्या घटना होतात. केरकळवाडी चौकात गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकारी, वर्धा नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले. आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून अरूंद असल्याने वाहतुकीला अडचणीचा ठरत होता. येथील नागरिकांनी वारंवार मागणी केल्यावर रस्ता रूंदीकरण करुन रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले. मात्र येथील चौकात गतिरोधक लावले नाही. या मार्गावर शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना रस्ता ओलांडून जावे लागते. रस्ता ओलांडत असताना वाहनांच्या गतीमुळे अपघाताचा धोका असतो. ३ फेब्रुवारीला झालेल्या घटनेत मोठी दुर्घटना टळली. गतिरोधक नसल्याने वाहन भरधाव येतात. केळकरवाडी चौकात चारही दिशेने वाहने येत असल्याने वाहनांच्या गतिमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहनांची दिवसरात्र ये-जा ल्राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. वर्धा-आर्वी मार्गावरील या केळकरवाडी चौकात गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. या मागणीचे निवेदन श्रीराम सिटीचे कर्मचारी वर्ग, पालक तसेच निरज इंगोले, हर्षल म्हस्के, सतीश तेलरांधे, संदीप पेटकर, अमोल राऊत व नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)