शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:58 IST

बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : महिलाश्रम मैदानावर बौद्ध धम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.महिलाआश्रम मैदानावर रविवारी आयोजित ३२ व्या बौद्ध धम्मपरिषदेत ते बोलत होते. विचारमंचावर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष शांतरक्षित महाथेरो येनाळा, उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे, सत्कारमूर्ती डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर, स्वागताध्यक्ष डी. के. पाटील, अ‍ॅड. शीतल कस्टम, राजेश ढाबरे, प्रजापाल शेंदरे, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, अनुपकुमार, अविनाश पाटील, नयन सोनवणे, राजाभाऊ ढाले, डॉ. सुभाष खंडारे, प्रा. शैलेंद्र निकोसे, प्रा. बी. एस. पाटील, माजी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, शालीक मेश्राम, धर्मपाल ताकसांडे, गजानन दिघाडे, धम्म परिषदेचे आयोजक भदंत राजरत्न उपस्थित होते.दुपारी बौद्ध धम्माची वास्तविकता, आदर्श आणि आपण या विषयावर आयोजित परिसंवादात राजरत्न आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले. परिसंवादात मार्गदर्शक म्हणून पुरोगामी विचारवंत सुषमा अंधारे यांनी बुद्ध व्हा शुद्ध व्हा, हा मूलमंत्र दिला. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी बुद्ध, संत तुकाराम, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर हे एकाच संस्कृतीचे पालक आहेत, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी धम्मध्वज ध्वजारोहण, बुद्धवंदनेने करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर विद्यालय, हिंगणघाटच्या विद्यार्थिनींनी स्वागत-अभिवादन गीत व नृत्य सादर केले. सायंकाळी डॉ. भावना ढाबरे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक भदंत राजरत्न तर संचालन सुनील ढाले यांनी केले. मुकुंद नाखले यांनी आभार मानले. परिषदेत डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी नीरज ताकसांडे, रूपचंद जामगडे, सितम मंदरेले, किशोर कांबळे, तारांचद पाटील, सचिन थूल, बागेश्वर, रेखा सोनवणे, वंदना पाटील, हरिका ढाले, ममता निकोसे, चंद्रकला मानकर, नितीन जुमडे, मंदाकिनी जवादे आदींनी सहकार्य केले.