शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार

By admin | Updated: March 8, 2015 01:44 IST

संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते ....

वर्धा : संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते आणि इतरांचे अस्तित्वही ज्यांना नकोसे वाटते, तेच या संविधानाचे खरे मारेकरी आहेत, असे प्रतिपादन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे यांनी केले़ अ.भा. अंनिसच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे १९ व्या लोकजागर होलिकोत्सवात अ‍ॅड. हलकारे यांचे ‘संविधानाचे मारेकरी’ विषयावर व्याख्यान आयोजित होते. स्थानिक स्मशानभूमीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे तर अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक, चित्रकार सुनील यावलीकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वानखेडे, अ.भा. अंनिसचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, डॉ. सुभाष खंडारे, प्रबोधनकार भाऊ थुटे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, माजी अध्यक्ष सुरेश राहाटे, कार्याध्यक्ष प्रा. सुचिता ठाकरे, संघटक पंकज वंजारे उपस्थित होते़ या देशातील प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय, त्यांचे सार्वभौमत्व, व्यक्तिस्वातंत्र्य यासाठी संविधान आहे; पण देशातील वर्णवादी, धर्मांधता, माओवाद, नक्षलवाद साम्राज्यवादी भांडवलशाही स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांनाच छेद देत आहे. देशातील या सनातनी मानसिकतेचे बळी चार्वाक, तुकाराम, गांधीपासून दाभोळकर, पानसरेंपर्यंतचे व्यक्तीस्वातंत्र्य जोपासणारे विचारवंत ठरले आहेत. मनूचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे; पण धर्मांध शक्तींना लोकशाही संसद नको तर धर्मसंसद हवी आहे. आम्हीच तेवढे श्रेष्ठ, असे मानणारे कोणत्याही धर्माचे कट्टरवादी असो, हे संविधानाचे मारेकरीच आहेत, असे हलकारे म्हणाले. देशातील लोकशाहीला दुसरा मोठा धोका नक्षलवादी संघटनांचा आहे. त्यांना भारताच्या लोकशाहीवर आधारित संविधान मान्य नाही. या देशाची आर्थिक धोरणे स्वमर्जीनुसार ठरविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांही संविधानाच्या मारेकरी आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कल्याणकारी राज्याची संकल्पना टप्प्या-टप्प्याने देशातून बाद झाली़ जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावावर देशाचे सार्वभौमत्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू झाले आहे. अशावेळी संविधानाचे प्राणपणाने रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे. संविधानाच्या मारेकऱ्यांचा पराभव करायचा असेल तर आम्ही मुकी बिचारी जनावरे नसून विचार करणारी माणसे आहोत, या जाणिवेतून एक व्हा, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक हरिष इथापे यांनी केले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार सुचिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय जवादे, अविनाश हलुले, आकाश जयस्वाल, शुभम जळगावकर, पराग दांडगे, सलील वानखडे, अंकुश कत्रोजवार, राहुल तेलरांधे, गणेश शेंडे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)