शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी राज्यघटना तर समाजासाठी ग्रामगीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:16 IST

देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. तसेच समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक व कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : ‘वर्धा ग्रंथोत्सव-२०१८’चे उद्घाटन, शहरात ग्रंथदिंडीतून केली वातावरण निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. तसेच समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक व कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वर्धा ग्रंथोत्सव- २०१८’ च्या उद्घाटन समारंभाप्रसगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.स्थानिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.पंकज भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्रा. अरूण फाळके, सुधीर प्रकाशनचे सुधीर गवळी आदी उपस्थित होते. ग्रंथोत्सवात लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलचे प्रा. वाकुडकर यांनी फित कापून व दीप प्रज्चलन करुन उद्घाटन केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रंथालयासाठी सभागृह आणि ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तकांचा संच दिला. पुस्तकांच्या सानिध्यात माणूस विचारशील होतो. भावी पिढीने या पुस्तकांना आपला मित्र बनवावे असे मत संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त करुन ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मेजवाणीचा वर्धेकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून ग्रंथपाल अस्मिता मंडपे यांनी ग्रंथोत्सवाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ग्रंथदिंडीने शहरात ग्रंथोत्सवाची वातावरणनिर्मिती केली. बजाज वाचनालयापासून सुरू झालेली ही ग्रंथ दिंडी वाजत गाजत ग्रंथालय कार्यालयात पोहचली. कार्यक्रमाचे संचालन सुषमा कोटेवार यांनी केलेवर्धा जिल्ह्याचे मॉडेल सर्वत्र राबवावे : भोयरभावी पिढी विचारशील आणि प्रगल्भ व्हावी यासाठी आमदार निधीचा उपयोग पुस्तकांचा संच देण्यासाठी होत आहे. ही कृती सर्व विकासकामांपेक्षा श्रेष्ठ असून वर्धा जिल्ह्याचे हे मॉडेल सर्वत्र राबवले जायला हवे, असा आशावाद आमदार डॉ.पंकज भोयर यांनी व्यक्त केला. आमदार झाल्यावर ग्रंथालय सुसज्ज करण्याचा पहिला निर्णय घेवून येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्ष आणि स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिलीत. त्यामुळे विद्यार्थी इथे बसून अभ्यास करायला लागलेत. बोलण्यापेक्षा कृतीतून विकास घडविण्यावर माझा विश्वास आहे. आमदार निधीचा ग्रंथालयापेक्षा दुसरा चांगला उपयोग होऊच शकला नसता. हा निधी ग्रामीण भागातील भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगात आणता आला; याचा आनंद आहे, असेही डॉ.भोयर म्हणाले.