शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

शेतकरी समर्थनार्थ काँग्रेसचे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन ...

ठळक मुद्देदत्तपूर बायपास वर दोन तास केली घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वेधण्यासाठी दोन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ सातव म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही असे त्यांनी सांगितले. आंदोलनात अंकुश पिंपरे, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, भक्तराज अलोणे, नरेंद्र गुजर, प्रल्हाद गिरीपुंजे, सुभाष देशमुख, राजेंद्र गवळी, रमेश खेडकर, सुधाकर घाडगे, सुरेश बोरकर, ज्ञानेश्वर वैद्य, राजकुमार बारी, रमेश गुरनुले आदी सहभागी झाले होते.या आहेत मागण्याशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांना मोफत पीक विम्याचे कवच देण्यात यावे, शेतीला पुरक व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे, महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यात यावे, बोंडअळी, गारपीट आदीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, शेतकºयांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविले.