शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील बालेकिल्ले वाचविण्यासाठी काँग्रेसचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:10 IST

वर्धा जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही.

ठळक मुद्देभाजपाच्या विद्यमान आमदारांसमोर आव्हान कमीदेवळीत युतीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबाजी भावे यांच्यासह विविध संतांची पावनभूमी असलेला जिल्हा आहे. ब्रिटिशकाळात वर्धा सेवाग्राम येथूनच इंग्रजांविरूद्ध महात्मा गांधींनी रणशिंग फुंकले, त्यामुळे या जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. १९८०-९० च्या दशकापर्यंत या जिल्ह्यात काँग्रेसचे अधिराज्य होते. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. मात्र, १९९० नंतर या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा शिरकाव झाला. आता तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही विधानसभेत आर्वी व देवळी हे गड राखून ठेवण्यात अमर काळे व रणजित कांबळे यशस्वी झालेत. तर हिंगणघाट हा शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत समीर कुणावार यांनी भाजपच्या तिकिटावर यश मिळविले. वर्धा मतदार संघात पंकज भोयर यांनी भाजपच्या तिकिटावर आर्श्चयकारक विजय मिळविला. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही.ग्रामपंचायतीपासून नगर पंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सेवा सहकारी संस्थांच्याही निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असून शिवसेना-भाजपची युती होईल, असे चित्र आहे. या युतीत वर्धा, हिंगणघाट व आर्वी या तीन मतदारसंघात भाजप उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. देवळी मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाण्याची शक्यता आहे. आघाडीत देवळी, आर्वी, वर्धा हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे तर हिंगणघाट मतदारसंघ राकाँकडे राहणार आहे. यावेळी विद्यमान काँग्रेस आमदारांसमोर विजयासाठी तुल्यबळ आव्हान निर्माण करण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे. देवळी मतदारसंघात सेनेसाठी भाजप कंबर कसून असून अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेले युवा नेते समीर देशमुख यांचे नाव या मतदार संघात उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर काळे यांच्यासमोर भाजपचे दादाराव केचे यांचे आव्हान राहणार आहे. या मतदार संघात युतीकडून केचे यांच्याशिवाय सुधीर दिवे यांनीही उमेदवारी मागितली आहे. पक्ष कुणाला उमेदवारी देतो, हे लवकरच कळेल. वर्धा मतदार संघात काँग्रेसकडून शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेससाठी सत्वपरीक्षादेवळी मतदारसंघात गेल्या पाच निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार रणजित कांबळे यांची या निवडणुकीत सत्वपरीक्षा आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत प्रभा राव यांच्या खºया वारसदार असलेल्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांना या मतदारसंघात १५ हजारांवर अधिक मतांचा फटका बसला आहे. प्रभा राव यांचा बालेकिल्ला राहिलेल्या या गृह मतदारसंघात चारूलता टोकस माघारणे, ही अतिशय जिव्हारी लागणारी बाब आहे. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवरही पक्षाची करडी नजर राहणार आहे.देशमुखांचाही नवा वारसदार येणार मैदानातराज्यसभेचे माजी खासदार दिवंगत बापूरावजी देशमुख यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी पुढे नेला. आता या कुटुंबातील तिसºया पिढीचे वारसदार समीर देशमुख यांच्या रूपाने शिवसेनेतून देवळी-पुलगाव मतदारसंघात निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. कुणबी बहुल मतदार संघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात त्यांचा सामना रणजित कांबळेंसोबत आहे. काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांनी पक्ष सोडून दुसरा घरठाव केल्याने देशमुखांचा वारसदार या निवडणुकीत काय इतिहास घडवितो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.वंचित आणि बसपही महत्त्वाचेवर्धा जिल्ह्याच्या राजकारणात बहुजन समाज पक्ष विधानसभा निवडणुकीत अनेकदा निर्णायक ठरला आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत देवळी मतदारसंघात बसप उमेदवाराने २४ हजार ९७३मते घेत तिसरे स्थान पटकाविले तर हिंगणघाट मतदारसंघात २५ हजार १०० मते घेत दुसºया स्थानावर बसपा राहिली. वर्धा मतदारसंघात २२ हजार २८३ तर आर्वी मतदारसंघात ५ हजार ३४८ मते मिळाली होती. त्यामुळे बसपचा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही या जिल्ह्यात संघटन बांधणीचे काम केल्यामुळे त्यांचेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.देवळीवर सर्वांची नजर२००९ च्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसकडून रणजित कांबळे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत कांबळे ३ हजार ७५५ मतांनी विजयी झाले. तर २०१४ च्या निवडणुकीत सुरेश वाघमारे भाजप व रणजित कांबळे काँग्रेस यांच्यात लढत झाली. यात अवघ्या ९४३ मतांनी ते निवडून आले. कांबळे यांना पराभूत करण्यासाठी यावेळी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. खासदार रामदास तडस यांची भूमिका येथे निर्णायक राहणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019