शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:39 IST

देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : जिल्हा काँगे्रस कमिटीचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.भाजपाचे केंद्र व राज्यातील सरकारच्या चुकीच्या कारभाराविरूद्ध जिल्हा काँगे्रस कमिटीद्वारे महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना भाजपा सरकार मदत करीत आहे. आजपर्यंत भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे देशात अराजकता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. देशात जातीयवाद पसरविण्याचे प्रयत्न सत्तारूढ भाजप करीत असताना काँगे्रस पक्षाने त्याविरूद्ध आवाज उठविण्याचे काम हाती घेतले. यासाठी देशव्यापी एकदिवसीय उपोषण केल्याचे कोल्हे सांनी सांगितले. उपोषणात प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव शेखर शेंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, विपीन राऊत, सुनील बासू, लक्ष्मण कांबळे, अमित गावंडे, जि.प. गटनेते संजय शिंदे, सदस्य चंद्रकांत ठक्कर, विवेक हळदे, मलघाम, प्रमोद लाडे, उज्ज्वला देशमुख, मनीष साहु, बाळा माऊस्कर, धर्मपाल ताकसांडे, मकरंद टोणपे, गजू खोंड, मनोहर खडसे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, अविनाश काकडे यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोदींचे मुखवटे घालून चॉकलेट वाटपपंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार वर्षांपासून जनतेला चॉकलेट देत असून शेतकरी, कष्टकऱ्यांची एकही मागणी पूर्ण करीत नाही. शिवाय महागाईवरही नियंत्रण नसल्याने मोदी यांचा मुखवटा घालून चॉकलेटचे वितरणही करण्यात आले. या कृतीतून काँगे्रस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र तथा राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदविला.अन् ओसरली गर्दीकाँगे्रसच्यावतीने सामाजिक समता, बंधुत्व व शांततेसाठी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. विरोधी पक्ष असल्याने या आंदोलनात लक्षणीय गर्दी अपेक्षित होती; पण सकाळी ती केवळ काही वेळापूरतीच दिसून आली. यानंतर हळू-हळू गर्दी ओसरत असल्याचे पाहावयाास मिळाले. आमदारांसह काही महत्त्वाचे पदाधिकारीही या उपोषण मंडपापासून फारकत घेऊन असल्याचेच दिसून आले.