शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:39 IST

देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : जिल्हा काँगे्रस कमिटीचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.भाजपाचे केंद्र व राज्यातील सरकारच्या चुकीच्या कारभाराविरूद्ध जिल्हा काँगे्रस कमिटीद्वारे महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना भाजपा सरकार मदत करीत आहे. आजपर्यंत भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे देशात अराजकता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. देशात जातीयवाद पसरविण्याचे प्रयत्न सत्तारूढ भाजप करीत असताना काँगे्रस पक्षाने त्याविरूद्ध आवाज उठविण्याचे काम हाती घेतले. यासाठी देशव्यापी एकदिवसीय उपोषण केल्याचे कोल्हे सांनी सांगितले. उपोषणात प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव शेखर शेंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, विपीन राऊत, सुनील बासू, लक्ष्मण कांबळे, अमित गावंडे, जि.प. गटनेते संजय शिंदे, सदस्य चंद्रकांत ठक्कर, विवेक हळदे, मलघाम, प्रमोद लाडे, उज्ज्वला देशमुख, मनीष साहु, बाळा माऊस्कर, धर्मपाल ताकसांडे, मकरंद टोणपे, गजू खोंड, मनोहर खडसे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, अविनाश काकडे यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोदींचे मुखवटे घालून चॉकलेट वाटपपंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार वर्षांपासून जनतेला चॉकलेट देत असून शेतकरी, कष्टकऱ्यांची एकही मागणी पूर्ण करीत नाही. शिवाय महागाईवरही नियंत्रण नसल्याने मोदी यांचा मुखवटा घालून चॉकलेटचे वितरणही करण्यात आले. या कृतीतून काँगे्रस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र तथा राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदविला.अन् ओसरली गर्दीकाँगे्रसच्यावतीने सामाजिक समता, बंधुत्व व शांततेसाठी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. विरोधी पक्ष असल्याने या आंदोलनात लक्षणीय गर्दी अपेक्षित होती; पण सकाळी ती केवळ काही वेळापूरतीच दिसून आली. यानंतर हळू-हळू गर्दी ओसरत असल्याचे पाहावयाास मिळाले. आमदारांसह काही महत्त्वाचे पदाधिकारीही या उपोषण मंडपापासून फारकत घेऊन असल्याचेच दिसून आले.