शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:39 IST

देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : जिल्हा काँगे्रस कमिटीचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.भाजपाचे केंद्र व राज्यातील सरकारच्या चुकीच्या कारभाराविरूद्ध जिल्हा काँगे्रस कमिटीद्वारे महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना भाजपा सरकार मदत करीत आहे. आजपर्यंत भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे देशात अराजकता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. देशात जातीयवाद पसरविण्याचे प्रयत्न सत्तारूढ भाजप करीत असताना काँगे्रस पक्षाने त्याविरूद्ध आवाज उठविण्याचे काम हाती घेतले. यासाठी देशव्यापी एकदिवसीय उपोषण केल्याचे कोल्हे सांनी सांगितले. उपोषणात प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव शेखर शेंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, विपीन राऊत, सुनील बासू, लक्ष्मण कांबळे, अमित गावंडे, जि.प. गटनेते संजय शिंदे, सदस्य चंद्रकांत ठक्कर, विवेक हळदे, मलघाम, प्रमोद लाडे, उज्ज्वला देशमुख, मनीष साहु, बाळा माऊस्कर, धर्मपाल ताकसांडे, मकरंद टोणपे, गजू खोंड, मनोहर खडसे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, अविनाश काकडे यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोदींचे मुखवटे घालून चॉकलेट वाटपपंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार वर्षांपासून जनतेला चॉकलेट देत असून शेतकरी, कष्टकऱ्यांची एकही मागणी पूर्ण करीत नाही. शिवाय महागाईवरही नियंत्रण नसल्याने मोदी यांचा मुखवटा घालून चॉकलेटचे वितरणही करण्यात आले. या कृतीतून काँगे्रस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र तथा राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदविला.अन् ओसरली गर्दीकाँगे्रसच्यावतीने सामाजिक समता, बंधुत्व व शांततेसाठी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. विरोधी पक्ष असल्याने या आंदोलनात लक्षणीय गर्दी अपेक्षित होती; पण सकाळी ती केवळ काही वेळापूरतीच दिसून आली. यानंतर हळू-हळू गर्दी ओसरत असल्याचे पाहावयाास मिळाले. आमदारांसह काही महत्त्वाचे पदाधिकारीही या उपोषण मंडपापासून फारकत घेऊन असल्याचेच दिसून आले.