शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरुच राहील

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत...

प्रकाश येंडे : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचा मेळावा आर्वी : ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. मागण्या मंजुर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संघर्ष सुरुच राहील, असे प्रतिपादन १९९५ राष्ट्रीय समन्वय समिती नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केले. आर्वी येथील गुरुवारी घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटक आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास अजमिरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश येंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी, बाजार समिती संचालक संदीप काळे, रमेशपंत जगताप, प्रकाश पाठक, भिमराव डोंगरे, पुंडलीक पांडे, अशोक राऊत, पी.डी. वानखडे, महम्मद युनुस, दिनकर सोळंके, गंगाधर काळे, शरद पावडे, गजानन निकम, सुनील वाघ, विजय कोकाटे, अशोक देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप काळे व रामदास अजमिरे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. येंडे पुढे म्हणाले की, ईपीएस १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या तुटपुंज्या पगारातून पै-पै कापून स्वत:चा पेन्शन फंड निर्माण केला, परंतु याचा सर्व हिशेब व अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवला. जमा केलेल्या पेन्शन फंडाच्या रकमेतून आज प्रत्येक पेन्शन धारकांना १५ ते २० हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या जमा रकमेच्या व्याजातून मिळू शकत असतानासुद्धा केंद्र सरकार या अल्पपेन्शन धारकांना फक्त दोनशे रुपये ते दोन हजार रुपये पेन्शन देवून बाकी पैसा हडप करीत आहे. ही पेंशन धारकाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या २१ आॅगस्टला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर मोर्चाद्वारे निवेदन तर ७ डिसेंबरला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनार्दन जगताप यांनी केले. संचालन दे.श.धरवार तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बा.दे.हांडे यांनी मानले. राष्ट्रीय समन्वय समिती तालुका शाखा आर्वी, कारंजा, आष्टी येथील संपूर्ण सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)