शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरुच राहील

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत...

प्रकाश येंडे : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचा मेळावा आर्वी : ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. मागण्या मंजुर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संघर्ष सुरुच राहील, असे प्रतिपादन १९९५ राष्ट्रीय समन्वय समिती नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केले. आर्वी येथील गुरुवारी घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटक आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास अजमिरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश येंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी, बाजार समिती संचालक संदीप काळे, रमेशपंत जगताप, प्रकाश पाठक, भिमराव डोंगरे, पुंडलीक पांडे, अशोक राऊत, पी.डी. वानखडे, महम्मद युनुस, दिनकर सोळंके, गंगाधर काळे, शरद पावडे, गजानन निकम, सुनील वाघ, विजय कोकाटे, अशोक देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप काळे व रामदास अजमिरे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. येंडे पुढे म्हणाले की, ईपीएस १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या तुटपुंज्या पगारातून पै-पै कापून स्वत:चा पेन्शन फंड निर्माण केला, परंतु याचा सर्व हिशेब व अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवला. जमा केलेल्या पेन्शन फंडाच्या रकमेतून आज प्रत्येक पेन्शन धारकांना १५ ते २० हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या जमा रकमेच्या व्याजातून मिळू शकत असतानासुद्धा केंद्र सरकार या अल्पपेन्शन धारकांना फक्त दोनशे रुपये ते दोन हजार रुपये पेन्शन देवून बाकी पैसा हडप करीत आहे. ही पेंशन धारकाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या २१ आॅगस्टला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर मोर्चाद्वारे निवेदन तर ७ डिसेंबरला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनार्दन जगताप यांनी केले. संचालन दे.श.धरवार तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बा.दे.हांडे यांनी मानले. राष्ट्रीय समन्वय समिती तालुका शाखा आर्वी, कारंजा, आष्टी येथील संपूर्ण सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)