शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरुच राहील

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत...

प्रकाश येंडे : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचा मेळावा आर्वी : ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. मागण्या मंजुर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संघर्ष सुरुच राहील, असे प्रतिपादन १९९५ राष्ट्रीय समन्वय समिती नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केले. आर्वी येथील गुरुवारी घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटक आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास अजमिरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश येंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी, बाजार समिती संचालक संदीप काळे, रमेशपंत जगताप, प्रकाश पाठक, भिमराव डोंगरे, पुंडलीक पांडे, अशोक राऊत, पी.डी. वानखडे, महम्मद युनुस, दिनकर सोळंके, गंगाधर काळे, शरद पावडे, गजानन निकम, सुनील वाघ, विजय कोकाटे, अशोक देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप काळे व रामदास अजमिरे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. येंडे पुढे म्हणाले की, ईपीएस १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या तुटपुंज्या पगारातून पै-पै कापून स्वत:चा पेन्शन फंड निर्माण केला, परंतु याचा सर्व हिशेब व अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवला. जमा केलेल्या पेन्शन फंडाच्या रकमेतून आज प्रत्येक पेन्शन धारकांना १५ ते २० हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या जमा रकमेच्या व्याजातून मिळू शकत असतानासुद्धा केंद्र सरकार या अल्पपेन्शन धारकांना फक्त दोनशे रुपये ते दोन हजार रुपये पेन्शन देवून बाकी पैसा हडप करीत आहे. ही पेंशन धारकाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या २१ आॅगस्टला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर मोर्चाद्वारे निवेदन तर ७ डिसेंबरला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनार्दन जगताप यांनी केले. संचालन दे.श.धरवार तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बा.दे.हांडे यांनी मानले. राष्ट्रीय समन्वय समिती तालुका शाखा आर्वी, कारंजा, आष्टी येथील संपूर्ण सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)