शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नानाजी देशमुख कृषी संजीवनीतील जाचक अटी शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:52 IST

शासनाच्या शेतकरीहिताच्या अनेक योजना असल्या तरी योजनेतील जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी घायकुतीस येतात. असाच प्रत्यय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत येत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या शेतकरीहिताच्या अनेक योजना असल्या तरी योजनेतील जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी घायकुतीस येतात. असाच प्रत्यय शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत येत असल्याने या योजनेचेही भवितव्य अधांतरीच असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प काही भागांसाठी सुरू केला आहे. पण, या प्रकल्पातील जाचक अटी लक्षात घेत्या त्या रद्द न करता प्रकल्प राबविल्यास एकही शेतकरी लाभार्थी लाभ घेऊ शकत नाही.या प्रकल्पातील शेतकऱ्यांना विहीर पाहिजे असल्यास एक चौरस किलोमीटर परिसरात आठपेक्षा अधिक विहिरी मागणाऱ्या शेतकऱ्यांना भूगर्भ विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र आणणे सक्तीचे केले आहे. तसेच कोणतेही साहित्य शेतकऱ्यांनी प्रथम रोखीने खरेदी करून नंतर अनुदान मागावे, अशा अटी घातल्या आहेत. रोहणा परिसरातील वाई, बोदड, चोरआंबा, गौरखेडा, सालदरा, दिघी, सायखेडा, वडगाव या सर्वच गावांत एक चौरस किलोमीटर परिसरात आधीच ८ विहिरी आहेत, तरीदेखील शेतकऱ्यांची खस्ता हालत आहे. या कामात १० टक्केही सिंचन नाही. योजनेतील अटीनुसार या भागात एकाही नवीन विहिरीला अनुदान मिळू शकत नाही.मग, हा प्रकल्प काय कामाचा, असा प्रश्न निर्माण होतो. विहिरी खोदण्यासाठी भूगर्भ विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. पण, भूगर्भ विभागातील अधिकारी म्हणतात, हा भाग ड्रायझोनमध्ये येतो. या कारणाने प्रमाणपत्र देता येत नाही. मग हे प्रमाणपत्रच मिळणार नसेल तर प्रकल्प कुचकामी ठरणार तसेच कृषी साहित्य खरेदी करताना लाभार्थींनी प्रथम हे साहित्य रोखीने खरेदी करून मग अनुदानाचा प्रस्ताव सादर करावा, ही अट आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक असून रोखीने साहित्य खरेदी करण्यासाठी हाताशी पैसे असलेला शेतकरी दुर्मीळ आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील एक चौरस किमीच्या परिसरात ८ पेक्षा अधिक विहिरी असून जिल्हा भूगर्भ विभागाचे प्रमाणपत्र सक्तीचे व साहित्याची अगोदर रोखीने खरेदी करणे अशा जाचक अटी रद्द केल्याशिवाय प्रकल्प लाभदायी ठरणार नाही.- रवींद्र बाळाजी जुवारेशेतकरी, रोहणा.

२६ जानेवारीच्या ग्रामसभेत घ्या ठरावशासनाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, असे वाटत असेल तर शासनाने उपरोक्त अटी रद्द कराव्या व त्यासाठी प्रकल्पात समाविष्ट गावातील ग्रामपंचायतीने येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेत तसा ठराव करून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी तथा प्रकल्पातील संचालकांना व संबंधित विभागाना पाठवाव्यात, असे आवाहन शेतकरी रवींद्र जुवारे व स्थानिक सरपंच सुनील वाघ यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती