शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:12 IST

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देगॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध : मोर्चा काढून सरकार विरोधी घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात काँग्रेस, राकाँ व सदर मुद्द्यांवर एकत्र आलेल्या समविचारी पक्षांनी स्थानिक बजाज चौक ते अंबिका चौक पर्यंत मोर्चा काढून सरकार विरोधी घोषणाबाजी केली.स्थानिक बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या सदर निषेध मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलून उपाय योजना कराव्या. केंद्र व राज्य सरकारने जनसामान्य विरोधी धोरण न अवलंबता सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून लोकहितार्थ धोरणाचा अवलंब करावा, आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी रेटून लावल्या होत्या. सदर निषेध मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, काँगेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे, राकाँचे माजी आमदार सुरेश देशमुख आदींनी केले.या निषेध मोर्चात कॉँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष सुनील कोल्हे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा हेमलता मेघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते रामभाऊ सातव, प्रविण हिवरे, राजेंद्र शर्मा, जि.प. चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, इक्राम हूसेन, निलेश खोंड, आयटकचे अस्लम पठाण, रवी शेंडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ विषयी एकत्र आलेल्या समविचारी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व्यापाऱ्यांनी फिरविली पाठपुकारण्यात आलेल्या बंदला वर्धा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदी पोळा व पुढे गणपती उत्सव असल्याने अनेक व्यापाºयांनी सोमवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे टाळल्याचे बाजारपेठेचा फेरफटका मारल्यावर दिसून आले. असे असले तरी वर्धा शहरातील काही व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला हे उल्लेखनिय.मोदी सरकारने गोर गरीबांचे कंबरडे मोडले आहे. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने समाजाच्या सर्वच घटकांचा विश्वासघात केला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ भाववाढीने गोरगरीबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सरकारने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. या सरकारने राजीनामा देऊन नव्याने जनादेश घ्यावा. युवकांमध्येही या सरकारबाबत नैराश्य निर्माण झाले आहे. या सरकारविरुद्ध चले जाव चळवळी प्रमाणे आंदोलन उभारण्याची गरज आहे.- सुधीर कोठारी, राकाँचे जेष्ठ नेते तथा सभापती, कृ.उ.बा.स. हिंगणघाट.राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. या निर्णयाचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत असले तरी चोर वाटेने तेथे दारू येऊन विक्री होत आहे. परिणामी, मोठा महसूल बुडत आहे. दारूबंदीच्या निर्णयानंतर शासकीय तिजोरीतील महसूल तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेलवर याचा अतिरिक्त भार टाकला. त्यामुळे पेट्रोल व डिझेल अधीक महागले आहे.- रणजित कांबळे, आमदार.भाजपाने निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. परंतु, ही आश्वासने पूर्ण करण्याकडे सध्याचे सरकार दुर्लक्षच करीत आहे. केंद्र व राज्य सरकार नाकाम ठरले आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणारीच आहे.- चारूलता टोकस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस.मागील साडेचार वर्षांपासून केंद्र व राज्यातील भाजपा सरकार नागरिकांच्या अडचणीत भरच टाकत आहे. या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अजूनही सुमारे सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत भाजपा सरकारने त्यांचे धोरण बदलविले नाही तर त्यांना जनता धडाच शिकवेल.- शेखर शेंडे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.