शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

By admin | Updated: April 27, 2017 00:43 IST

पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून

व्हीजेएमचा हनुमान टेकडीवरील उपक्रम : १० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट वर्धा : पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासह पठार हिरवेगार करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम चांगलाच आकार घेऊ लागला आहे. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी हनुमान टेकडीवर छोटेखानी कार्यक्रमासह पुढील संकल्पसिद्धीबाबत नियोजन ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. काँग्रेस गटनेते संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसरंक्षक दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपिस्थत होते. प्रारंभी वर्षपूर्तीनिमित्त टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाच रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीच्या आकृतीतील आकर्षक केक कापून पहिला वर्षपूर्तीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याबाबत रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे वाचन करण्यात आले. व्हीजेएमने २६ एप्रिल २०१६ या दिवशी हनुमान टेकडीवरील श्रमदानाचे अभियान सुरू केले. प्रारंभी टेकडीवर उतरत्या क्रमाने प्रत्येक तीन फुटांच्या अंतरावर दोन फुट रूंद, दोन फुट खोल व आठ फुट लांब असे २०० समस्तर चर खोदण्यात आले.