शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

By admin | Updated: April 27, 2017 00:43 IST

पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून

व्हीजेएमचा हनुमान टेकडीवरील उपक्रम : १० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट वर्धा : पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासह पठार हिरवेगार करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम चांगलाच आकार घेऊ लागला आहे. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी हनुमान टेकडीवर छोटेखानी कार्यक्रमासह पुढील संकल्पसिद्धीबाबत नियोजन ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. काँग्रेस गटनेते संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसरंक्षक दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपिस्थत होते. प्रारंभी वर्षपूर्तीनिमित्त टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाच रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीच्या आकृतीतील आकर्षक केक कापून पहिला वर्षपूर्तीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याबाबत रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे वाचन करण्यात आले. व्हीजेएमने २६ एप्रिल २०१६ या दिवशी हनुमान टेकडीवरील श्रमदानाचे अभियान सुरू केले. प्रारंभी टेकडीवर उतरत्या क्रमाने प्रत्येक तीन फुटांच्या अंतरावर दोन फुट रूंद, दोन फुट खोल व आठ फुट लांब असे २०० समस्तर चर खोदण्यात आले.