शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्याकरिता पाटचऱ्यांचे काम पूर्ण करा

By admin | Updated: December 19, 2015 02:05 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा वर्धा : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा. तसेच या प्रकल्पांंतर्गत येणाऱ्या लिंबोळथी व दौलतपूर या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाची कारवाई एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील आजनसरा, लालनाला, बोरधरण, शिरूड प्रकल्प, धाम प्रकल्पाच्या उंची वाढविण्यासंबंधीचे प्रस्ताव तत्काळ सादर करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचेही ते म्हणाले. सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करताना रमाई घरकुल योजना, शबरी योजना, इंदिरा आवास योजनेसह लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन घरकुलाचे एकत्र बांधकाम करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना स्वत: घर बांधकामाला प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही यावेळी केल्यात. सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच वनक्षेत्रात असलेल्या गरमसूरसह इतर गावांना जोडणारे रस्ते वनविभागाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण करण्यात यावेत. टंचाई परिस्थतीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करताना टंचाई आराखड्यानुसार तयार केलेल्या योजना तात्काळ पूर्ण करा यासाठी आवाश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात माहिती देऊन कालबद्ध कार्यक्रमानुसार सिंचन, वीज, रस्ते विकास, ग्रामविकास व टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून वर्धा जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीततील निर्णयासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.(प्रतिनिधी)सेवाग्राम विकास आराखड्याला प्राधान्यक्रम भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र राहिलेल्या सेवाग्राम तसेच परिसराच्या विकासासोबतच महात्मा गांधी यांच्या विचाराचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.सेवाग्राम विकास आराखड्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती करण्यात आली. हा प्रकल्प महात्मा गांधी यांच्या आगामी १५० व्या जयंती वर्षापूर्वी पूर्ण व्हावा यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी पंपाना वीज जोडणे, नादुरूस्त रोहित्र बदलणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.