शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्याकरिता पाटचऱ्यांचे काम पूर्ण करा

By admin | Updated: December 19, 2015 02:05 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा वर्धा : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा. तसेच या प्रकल्पांंतर्गत येणाऱ्या लिंबोळथी व दौलतपूर या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाची कारवाई एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील आजनसरा, लालनाला, बोरधरण, शिरूड प्रकल्प, धाम प्रकल्पाच्या उंची वाढविण्यासंबंधीचे प्रस्ताव तत्काळ सादर करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचेही ते म्हणाले. सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करताना रमाई घरकुल योजना, शबरी योजना, इंदिरा आवास योजनेसह लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन घरकुलाचे एकत्र बांधकाम करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना स्वत: घर बांधकामाला प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही यावेळी केल्यात. सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच वनक्षेत्रात असलेल्या गरमसूरसह इतर गावांना जोडणारे रस्ते वनविभागाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण करण्यात यावेत. टंचाई परिस्थतीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करताना टंचाई आराखड्यानुसार तयार केलेल्या योजना तात्काळ पूर्ण करा यासाठी आवाश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात माहिती देऊन कालबद्ध कार्यक्रमानुसार सिंचन, वीज, रस्ते विकास, ग्रामविकास व टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून वर्धा जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीततील निर्णयासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.(प्रतिनिधी)सेवाग्राम विकास आराखड्याला प्राधान्यक्रम भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र राहिलेल्या सेवाग्राम तसेच परिसराच्या विकासासोबतच महात्मा गांधी यांच्या विचाराचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.सेवाग्राम विकास आराखड्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती करण्यात आली. हा प्रकल्प महात्मा गांधी यांच्या आगामी १५० व्या जयंती वर्षापूर्वी पूर्ण व्हावा यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी पंपाना वीज जोडणे, नादुरूस्त रोहित्र बदलणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.