शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गांधी जयंतीपर्यंत ४५ टक्के कामे करणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:19 IST

शहरासह सेवाग्राम व पवनारचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या तीन टप्प्यातील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस : सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे युद्धपातळीवर सुरू

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह सेवाग्रामपवनारचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या तीन टप्प्यातील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या ही कामे ४० टक्के पूर्ण झाली असून २ आॅक्टोबरपर्यंत सदर कामे ४५ टक्के पूर्ण करीत प्रत्यक्ष कार्यातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे.सेवाग्राम विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देताच प्रत्यक्ष सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात पवनार येथील धाम नदी पात्र सौंदर्यीकरण, सभागृहाचे बांधकाम, पाण्याची टाकी, वाहनतळ ही कामे हाती घेण्यात आली. तर याच कामांसोबतच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे. सेवाग्राम विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सध्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे ४० टक्के पूर्ण झाली आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून सरकारने हाती घेतलेल्या व राज्य सरकारसाठी महत्त्वाकांशी असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याचे काम ४५ टक्के पूर्ण करीत प्रत्यक्ष कामातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी बापूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.‘सेल्फी पॉर्इंट’ घालणार अनेकांना भुरळसेवाग्राम विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या सेवाग्राम भागातील सभागृहाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. हे सभागृह सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानकडे वळते केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या सभागृहाला गांधी विचारांचा ऐतिहासीक जोड देण्यासाठी येथे जगातील सर्वात मोठा चरखा उभारल्या जात आहे. सदर चरखा उभारून त्या परिसराचे सौंदर्यीकरणे करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबरपर्यंत ७० टक्के काम पूर्ण होणार असून हा परिसर पर्यटकांना भुरळच घालणार आहे. पर्यटकही या ठिकाणी आल्यावर एक सेल्फी घेण्याचा मोह आवरू शकणार नाही.देखरेख होतेय मुंबईच्या नामवंत कंपनीकडूनसेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांचा कंत्राट खासगी कंत्राटदाला देण्यात आला असला तरी त्या कंत्राटदाराकडून गुणवत्तापूर्वक काम करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहेत.इतकेच नव्हे तर राज्यातील नामवंतापैकी एक असलेल्या मुंबई येथील अडारकर असोसीएटकडे सदर बांधकामाच्या देखरेखेची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीचे सुमारे चार तज्ज्ञ सध्या वर्धेत सेवा देत असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत तोडले नाही एकही वृक्षसेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होत असलेल्या तिनही टप्प्यातील कामांदरम्यान आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने एकही वृक्ष तोडण्यात आलेले नाही.इतकेच नव्हे तर एखाद्या जागी मोठे वृक्ष येत असल्यास त्या वृक्षाचे सौंदर्य होत असलेल्या विकास कामात कसे वापरता येईल यासाठीही प्रत्यन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामPavnarपवनार