शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

विहिरीतील पाणी मिळविण्यासाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल ...

ठळक मुद्देआदर्शनगरातील प्रकार : वेळप्रसंगी उडते शाब्दिक चकमक

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल करण्यासाठी येथे दररोज स्पर्धाच लागते. बहूदा अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने येथे शाब्दिक चकमकही उडते. विशेष म्हणजे येथे सकाळी सकाळीच पाण्यासाठी वाद होत असल्याचे बघावयास मिळत असून तालुका प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.स्थानिक ग्रामपंचायतचे सदैव दुर्लक्ष राहिलेला भाग म्हणजे आदर्शनगर. येथील नागरिकांना प्रत्येक उन्हाळ्यात भीषण जलटंचाईलाच सामोरे जावे लागते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्याचे ग्रा.पं.तील काही लोकप्रतिनिधी सांगत असले तरी वास्तविक परिस्थिती काय याची प्रचिती सकाळी या भागाचा फेरफटका मारल्यावर येतो. घागर-घागर पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असतना दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. या भागातील अनेक विहिरींसह बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. ज्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीतून मोटारच्या सहाय्याने सकाळीच पाण्याचा उपसा केल्या जातो. त्यामुळे जो उशीराने पोहोचला त्याला थेंबभरली पाणी मिळत नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मोटार पंप काढले विहिरीबाहेररविवारी सकाळी १० च्या सुमारास विहिरीजवळ शंभराच्या जवळपास नागरिक एकत्र आले. विशेष म्हणजे हे सर्व पाण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे येथे काही काळाकरिता तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाण्यासाठी सुरू असलेला वाद पोलिसांनी मध्यस्तीकरून सोडविला. त्यानंतर विहिरीतील मोटारपंप काढण्यात आले. शिवाय प्रत्येकाने खिराडीचा वापर करून विहिरीतील पाणी घ्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.ग्रा.पं. प्रशासनाने नेहमीच आदर्शनगराकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ग्रा.पं. प्रशासन केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आहे.- रोशन तेलंग, रहिवासी.विहिरीवरील मोटरपंपची संख्या वाढली. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने वाद निर्माण झाला होता. मोटरपंप काढण्यात आले असून आजच खिराडी लावण्यात येणार आहे.- दीपक भोंगाडे, ग्रा.पं. सदस्य, सेवाग्राम.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई