शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

विहिरीतील पाणी मिळविण्यासाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल ...

ठळक मुद्देआदर्शनगरातील प्रकार : वेळप्रसंगी उडते शाब्दिक चकमक

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भीषण पाणी समस्येचा सामना आदर्शनगरवासियांना सोसावा लागत आहे. आधार ठरलेल्या विहिरीतून मोटरपंपाने पाण्याची उचल करण्यासाठी येथे दररोज स्पर्धाच लागते. बहूदा अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने येथे शाब्दिक चकमकही उडते. विशेष म्हणजे येथे सकाळी सकाळीच पाण्यासाठी वाद होत असल्याचे बघावयास मिळत असून तालुका प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.स्थानिक ग्रामपंचायतचे सदैव दुर्लक्ष राहिलेला भाग म्हणजे आदर्शनगर. येथील नागरिकांना प्रत्येक उन्हाळ्यात भीषण जलटंचाईलाच सामोरे जावे लागते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्याचे ग्रा.पं.तील काही लोकप्रतिनिधी सांगत असले तरी वास्तविक परिस्थिती काय याची प्रचिती सकाळी या भागाचा फेरफटका मारल्यावर येतो. घागर-घागर पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असतना दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. या भागातील अनेक विहिरींसह बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. ज्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीतून मोटारच्या सहाय्याने सकाळीच पाण्याचा उपसा केल्या जातो. त्यामुळे जो उशीराने पोहोचला त्याला थेंबभरली पाणी मिळत नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मोटार पंप काढले विहिरीबाहेररविवारी सकाळी १० च्या सुमारास विहिरीजवळ शंभराच्या जवळपास नागरिक एकत्र आले. विशेष म्हणजे हे सर्व पाण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे येथे काही काळाकरिता तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाण्यासाठी सुरू असलेला वाद पोलिसांनी मध्यस्तीकरून सोडविला. त्यानंतर विहिरीतील मोटारपंप काढण्यात आले. शिवाय प्रत्येकाने खिराडीचा वापर करून विहिरीतील पाणी घ्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.ग्रा.पं. प्रशासनाने नेहमीच आदर्शनगराकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ग्रा.पं. प्रशासन केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आहे.- रोशन तेलंग, रहिवासी.विहिरीवरील मोटरपंपची संख्या वाढली. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने वाद निर्माण झाला होता. मोटरपंप काढण्यात आले असून आजच खिराडी लावण्यात येणार आहे.- दीपक भोंगाडे, ग्रा.पं. सदस्य, सेवाग्राम.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई