शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

नुकसानभरपाई द्या, कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले असून, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विद्युत जोडणी कापली जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी आणि विद्युत जोडणी तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली. या सर्व नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे १७८ कोटींची मागणी करण्यात आली. पण, अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.एकीकडे शासनाकडे असलेला शेतकऱ्यांच्या हक्काचा मदत निधी दिला जात नाही तर दुसरीकडे पैश्याअभावी विद्युत देयक थकल्याने महावितरणकडून कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी आता रब्बी हंगामातीलही पीक  धोक्यात आले आहे. या अन्याविरुध्द आवाज उठविण्याकरिता भाजपाचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी याकरिता खासदार रामदास तडस, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जि. प. च्या सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकारी  देशभ्रतार यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRamdas Tadasरामदास तडस