शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्रीशिप’ उत्पन्न मर्यादा निर्णयाच्या दिरंगाईबाबत वर्ध्यात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:59 IST

राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देओबीसींमध्ये रोष हिवाळी अधिवेशनात अन्नत्याग आंदोलन करणार

आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी ओबीसींची क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्याचा शासन निर्णय घेतला; पण दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली आहे.केंद्र सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये ओबीसींची क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्याबाबतचा निर्णय घेतला; पण राज्य सरकारने नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. हा निर्णय न झाल्यामुळे शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय अधांतरी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ६ आॅक्टोबर २००३, १२ मार्च २००७, १७ जानेवारी २००८, ३ फेब्रुवारी २०१२ व १३ मार्च २०१२ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्नमर्यादा ही क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेत असावी, असा निर्णय असल्याने क्रिमीलेअर उत्पन्नमर्यादेचा शासन निर्णय झाल्याशिवाय फ्रीशिप उत्पन्नाचा जीआर निघू शकत नाही; पण राज्य शासनाने याविषयी निर्णय न घेतल्याने ओबीसी समाजात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने हा मुद्दा तातडीने सोडवावा, अशी मागणी आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ आॅक्टोबर रोजी नागपूर येथे एक बैठक घेण्यात आली. यात हिवाळी अधिवेशन काळात अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीला ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर होते.तत्पर विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री होताच झाले संथकॉँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केंद्र शासनाने १६ मे २०१३ रोजी क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करण्याचा निर्णय घेतला होता. लगेच राज्य शासनाने सात दिवसांच्या आत २४ जून २०१३ रोजी पुन्हा निर्णय घेऊन तत्परता दाखविली होती; पण फ्रीशिप उत्पन्नमर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करण्याचा शासन निर्णय त्यावेळी झाला नाही. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री राज्यात विरोधी पक्षात असताना फ्रीशिपच्या उत्पन्न मर्यादेबाबत डिसेंबर २०१३ ते १५ या काळात त्यांनी वेळोवेळी विधीमंडळातील विविध आयुधांचा वापर करून सभागृह बंद पाडले, आंदोलन केले आणि २० आॅगस्ट २०१६ ला फ्रीशिपचा जीआर निघाला; पण आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही ओबीसी क्रिमीलेअर व फ्रीशिप उत्पन्नाचा शासन निर्णय घेतलेला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Politicsराजकारण