शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

स्वगावी येताय? एवढे कराच, कोरोनाचे टळेल संक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या.

ठळक मुद्देमहात्मा फुले समता परिषदेचे दिवाकर गमे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे, तेव्हा स्वगावी येताय तर काही नियम पाळायलाच हवे, तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू शकू, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.स्वगावी वर्ध्यात येताना चोरट्या मार्गाने येऊ नका तर राजरोसपणे या, गाव आमचे-तुमचे असल्याने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा, नक्कीच तुमचे स्वागत होईल. केवळ १५ दिवस विलगीकरणात रहा, या काळात घरातील कुणालाही स्पर्श करू नका, वस्तूंचा एकत्रित वापर करणे टाळा, किराणा, भाजीपाला धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज भासली तर मोबाईलवरून संपर्क करून सांगा अथवा लांबूनच हाक मारा, विलगीकरणात राहिले म्हणजे गावातील नागरिकांना तुमचा अभिमान वाटेल, शेजारी व इतर तुम्हाला पैसे नसतील तरी हवी ती मदत करतील. विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या. या संपूर्ण बाबींचे पालन केले तर आपण कारोनाविरुद्धचा लढा सहजपणे जिंकू शकू, असे प्रा. गमे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या