शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अस्वलीच्या शोधात वनविभागाचे कोम्बींग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:51 IST

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकºयांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभºयापासून जंगलात ४० वनकर्मचारी ठाण मांडून आहेत.

ठळक मुद्देआठवडाभरापासून ४० वनकर्मचारी जंगलात : धाडी मौजा पार करून अस्वल गेली पार्डी शिवारात

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभऱ्यापासून जंगलात ४० वनकर्मचारी ठाण मांडून आहेत. अस्वलीने आपला मुक्काम धाडी मौजा पार करून पार्डीमध्ये हलविल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आष्टी वनपरिक्षेत्रामध्ये माणिकवाडा, धाडी, मोई, या भागात अस्वलीचे वास्तव्य होते. शेतकºयांवर जीवघेणे हल्ले केल्यावर अस्वल प्रकरण शांत झाले; पण दोन महिने लोटताच अस्वलीने पुन्हा पिलांसह परतून धाडी जंगलात मुक्काम ठोकला. जंगलाशेजारील शेतामध्ये अस्वलीचे दर्शन मजूर, शेतकरी तसेच जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराखींना व्हायचे. जनावर चारण्यासाठी नेतात धाडी येथील गुराखी विश्वनाथ राऊत यांच्यावर अस्वलीने हल्ला करून त्यांना गतप्राण केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी तात्काळ नियोजन करून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले. गावागावात बॅनर लावले. आॅडीओ क्लीप तयार करून भ्रमणध्वनीवर व्हॉट्स अ‍ॅप माध्यमातून संदेशीत केली. शिवाय दवंडीही देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना अस्वलीपासून सरंक्षण मिळावे म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सचिव सदस्यांसह वनकर्मचारी व गावकरी यांच्या एकूण नऊ गावात सभा घेतल्या. त्यामध्ये बोरखेडी, थार, पांढुर्णा, धाडी, बोरगाव, झाडगाव, सत्तरपुर, टुमणी, पंचाळा या गावातील शेतकऱ्यांना शेतात जाताना घ्यावयाची काळजी व सावधानता विषयी माहिती देण्यात आली. हातात काठी रॉकेलचे टेंभे, घेवून एकट्याने न जाता तीन चार जणांनी सोबत जाण्याचे सांगितले. धाडीच्या जंगलात कोम्बींग आॅपरेशन सुरू केल्यावर ४० वनकर्मचाऱ्यांनी दररोज सहा कि.मी. याप्रमाणे परिसर पिंजून काढला आहे. घाबरलेल्या अस्वल धाडी जंगल सोडून पार्डी जंगलात पळाली असली तरी पार्डी हे तळेगाव वनविभागांगर्तत असून आष्टीची हद्द लागून आहे. त्यामुळे जंगलात वन विभागाचे कर्मचारी कायम आहेत. अस्वलीने पार्डी येथील प्रभाकर सरोदे यांच्यावर हल्ला केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. सुहास पाटील यांनी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. पण अद्यापही अस्वल हाती लागलेली नाही, हे विशेष.अस्वलीला खाद्य पाहिजेअस्वल खाद्य असले त्याच ठिकाणी तग धरते. सध्या हल्ले करीत असलेली अस्वल तिच्या दोन पिलांसह सैरावैरा जंगलात या ठिकाणावरून त्या ठिकाणी पळत आहे. चवताळलेली अस्वल म्हणून तिची वनविभागाने नोंद आहे. अस्वलीला अंमलातासच्या फुल, शेंगा खाद्य पाहिजे, वारूळातील मुंग्या, माकोडे बोर, मोहा, आवडते खाद्य आहे. वनविभागाने जंगलात ठिकठिकाणी मोहा ठेवला आहे. त्यावर कर्मचारी पाळत ठेवून आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग