शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आर्द्रतेमुळे थंडी ओसरली

By admin | Updated: October 27, 2016 00:44 IST

शरद पौर्णिमेपासून गुलाबी थंडीची चाहुल लागते. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी जाणवत होती.

बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणामवर्धा : शरद पौर्णिमेपासून गुलाबी थंडीची चाहुल लागते. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी जाणवत होती. किमान तापमान १८ अंशांपर्यंत खाली आले होते; पण गत आठवड्यापासून थंडी ओसरल्याचे जाणवत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, ढग तयार झाले असून थंडी कमी होऊन तापमान वाढल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. दिवाळीत पहाटे थंडीत उठून अभ्यंगस्थानाचा वेगळाच आनंद असतो. सध्या थंडी त्या प्रमाणात जाणवत नसल्याने या आनंदावर विरजण पडेल काय, असे वाटायला लागले आहे; पण हा कमी दाबाचा पट्टा थायलंड, मलेशिया दिशेने सरकला असल्याने दोन ते तीन दिवसांत थंडी जाणवेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास थंडी ओसरते. शिवाय दिवसेंदिवस थंडीचे आगमन लांबत असल्याचे दिसून येते. आॅक्टोबर महिना हा मध्य भारतात ‘आॅक्टोबर हीट’ म्हणून ओळखला जातो. यंदा पाऊस सरासरीनुसार झाल्याने थंडी चांगली पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्याची प्रचिती नवरात्रीच्या प्रारंभापासून वर्धेकरांनी घेतली. नवरात्रीच्या काळात दिवसाला उन्हाचे चटके जाणवत असले तरी सायंकाळनंतर वातावरणात सुखद गारवा पसरत होता. ही थंडीची चाहुल असल्याचे मानले गेले; पण ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरल्याचे दिसून आले.(स्थानिक प्रतिनिधी)दोन-तीन दिवसांत जाणवणार थंडीदोन ते तीन दिवसांत आकाश पुन्हा निरभ्र होऊन थंड जाणवायला लागेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. साधारणत: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीला सुरुवात होते; पण उत्तरेकडील वारे अद्याप विदर्भापर्यंत पोहोचले नसल्याने थंडीचा प्रकोप अजून सुरू झालेला नसल्याची माहिती कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाचे अभ्यासक नितीन डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.