शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे केळी बागावर करपा

By admin | Updated: December 29, 2014 23:50 IST

तालुक्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अकाली पावसानंतर किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सीअसपेक्षा खाली आला आहे. या प्रतिकुल हवामानाचा अनिष्ट परिणाम केळीच्या मृग व कांदेबागावर झाला आहे.

सेलू : तालुक्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अकाली पावसानंतर किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सीअसपेक्षा खाली आला आहे. या प्रतिकुल हवामानाचा अनिष्ट परिणाम केळीच्या मृग व कांदेबागावर झाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी केळीच्या पिकांवर करपा व चरका या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे आता बागायतदार शेतकरीही संकटात सापडले आहेत़थंड वातावरणामुळे केळीच्या नवीन पिकांची वाढ खुंटली आहे. पाने पिवळी पडून करपत आहेत़ या समस्या सध्या केळी बागांमध्ये दिसून येत आहे. सध्या मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. केळीच्या पिकाला १६ ते ४० अंश सेल्सीअस तापमान मानवते; पण सध्या तापमान १० अंशांपेक्षा खाली आले आहे़ यामुळे बागांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. परतीचा पाऊस न आल्याने बागांमध्ये करपा किंवा चरक्याचा फारसा प्रार्दुभाव जाणवला नव्हता; पण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरला आहे़ तापमान कमी झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बऱ्याच ठिकाणी कोवळी पाने काळी पडून पिवळी पडत आहे. काही ठिकाणी जुनी पाने पिवळी पडून करपण्याचे प्रकार वाढले आहेत. थंडीचा जोर असाच कायम राहिल्यास गहू व हरभरा या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल तर केळी उत्पादक संकटात सापडणार असल्याचे दिसते़ मृग बागांमधील नवीन पाने निसवण्याचे प्रमाण कमी झाले असून नवीन निसवलेली पाने थंडीमुळे काळवडंलेली आहेत. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. आधीच अनेक संकटांचा सामना करणारा शेतकरी बेजार असताना त्यांच्या समस्यांत आणखी भर पडत असल्याचे दिसते़ येथील काही शेतकऱ्यांचे केळी हे मुख्य व नगदी पीक आहे. आता हे पिकही हातचे जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत़ कृषी विभागाने केळी बागांवर आलेल्या करपा व चरका या रोगांवर उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)