शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

नगरपालिका क्षेत्रातच आचारसंहिता

By admin | Updated: October 21, 2016 01:59 IST

निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट : ग्रामीण विकासाचा मार्ग मोकळावर्धा : निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे. त्यांना कोणतेही निर्बंध नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने एका पत्रान्वये स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरच्या पत्रान्वये एका जिल्ह्यात ४ वा त्यापेक्षा अधिक नगर परिषदा/नगर पंचायतींच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे निवडणुका नसतानाही ग्रामीण भागातील विकासांना खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत अनेक क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या नगर परिषदा/नगर पंचायतीच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव न टाकणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/महानगर पालिका व नगर परिषदा/नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुका असल्यामुळे या क्षेत्रात ही आदर्श आचार संहिता लागू राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर भाग यातून वगळण्यात आला आहे. या भागात विकास कामे करण्यात लोकप्रतिनिधींना कोणतीही अडचण होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)