शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

नगरपालिका क्षेत्रातच आचारसंहिता

By admin | Updated: October 21, 2016 01:59 IST

निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट : ग्रामीण विकासाचा मार्ग मोकळावर्धा : निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे. त्यांना कोणतेही निर्बंध नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने एका पत्रान्वये स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरच्या पत्रान्वये एका जिल्ह्यात ४ वा त्यापेक्षा अधिक नगर परिषदा/नगर पंचायतींच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे निवडणुका नसतानाही ग्रामीण भागातील विकासांना खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत अनेक क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या नगर परिषदा/नगर पंचायतीच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव न टाकणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/महानगर पालिका व नगर परिषदा/नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुका असल्यामुळे या क्षेत्रात ही आदर्श आचार संहिता लागू राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर भाग यातून वगळण्यात आला आहे. या भागात विकास कामे करण्यात लोकप्रतिनिधींना कोणतीही अडचण होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)