शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

धुऱ्यासोबत वृक्षांचाही कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. यात शेतकरी शेतातील काडी कचरा, धुºयावरील गवत, झुपडे पेटवत आहे. हे करीत असताना शेतातील तथा रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अजस्त्र वृक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यात पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.पावसाळ्यापूर्वी शासनाकडून कोट्यवधी खर्च करून वृक्ष ...

ठळक मुद्देशेतकरी पेटवितात धुरे : पर्यावरणाचा ºहास रोखण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. यात शेतकरी शेतातील काडी कचरा, धुºयावरील गवत, झुपडे पेटवत आहे. हे करीत असताना शेतातील तथा रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अजस्त्र वृक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यात पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.पावसाळ्यापूर्वी शासनाकडून कोट्यवधी खर्च करून वृक्ष लावले जातात. यासाठी सर्व शासकीय विभाग तथा सामाजिक संस्था, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यासह स्थानिक स्वराज्य संस्थाना कामाला जुंपले जाते. जिल्ह्यात या माध्यमातून कोट्यवधी झाडे लावली जात आहे. काही प्रमाणात त्यांचे संगोपनही केले जाते; पण प्रत्येक उन्हाळ्यात हजारो झाडांचा बळी जातो. धुºयाला लावलेल्या आगीत मोठी झाडे भस्मसात होतात. हा प्रकार जिल्ह्यात प्रत्येक मार्गावर सर्रास दिसून येतो. कचरा पेटविण्याच्या नादात लाखमोलाची झाडे जळत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असून पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान होत आहे. वर्धा ते वायगाव, पुलगाव ते दहेगाव, वायगाव ते देवळी, आर्वी ते पुलगाव, वर्धा ते आर्वी यासह अन्य मार्गांवर शेकडो वृक्ष जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. पुलगाव मार्गावर रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजूंची झाडे जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. देवळी तथा वर्धा तालुक्यातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतांत आगी लावण्याचे प्रकार केले जात आहेत. असाच प्रकार वायगाव आणि आर्वी मार्गावर वर्षभर पाहावयास मिळतो. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.आगीच्याही अनेक घटनाशेतातील धुरे पेटविण्याच्या प्रकारातून अनेक गावांत आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात गोठ्यातील साहित्याचा कोळसा झाला आहे. यातून वाद उद्भवून ते पोलिसांत पोहोचले आहेत. असे असताना जिल्ह्यात अद्यापही धुरे जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. या प्रकारातून शेजारी शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्याची वेळही शेतकऱ्यावर आली आहे.शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरजशेतकºयांकडून धुरे पेटविताना त्यांच्याकडून काटेरी झुडपे वा शेतात उगविलेली पिकांना त्रासदायक ठरणारी झुडपे जाळल्या जातात. ही झुडपे जाळताना शेतकरी आग लावून निघून जातात. यामुळे ही आग धुऱ्याने वाढत जाते. या प्रकारात मोठ मोठी झाडे आगीच्या विळख्यात येतात. यातून अनेक औषधीयुक्त झाले जाळल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे शेतीची कामे करताना धुरे जाळण्याच्या प्रकाराबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यामुळे कचरा जाळण्याच्या या प्रकारामुळे कोळसा होणारी मोठ मोठी झाडे वाचविणे शक्य होईल. याचा विचार जिल्हा प्रशासनाने करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास धुऱ्यावर जळणारी ही मोठ मोठी झाडे वाचण्यास मदत होईल.अनेक झाडांचा आतून कोळसाधुऱ्याच्या आगीत होरपळलेली अनेक झाडे वरून ठीक दिसली तरी आतून जळत असतात. यामुळे अनेक झाडांचा कोळसा झालेला दिसतो.