शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मालगाडीतून सर्रास चोरला जातोय कोळसा

By admin | Updated: July 15, 2015 02:45 IST

रेल्वेच्या प्रवासात वर्धा, सेवाग्राम ही रेल्वे स्थानके महत्त्वपूर्ण आहे; पण या स्थानकांदरम्यान थांबलेल्या वा धीम्या गतीने चालणाऱ्या मालगाड्यांतील कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे.

वर्धा, सेवाग्राम, पुलगाव, भूगाव येथील प्रकार : रेल्वे पोलिसांचे होतेय दुर्लक्षवर्धा : रेल्वेच्या प्रवासात वर्धा, सेवाग्राम ही रेल्वे स्थानके महत्त्वपूर्ण आहे; पण या स्थानकांदरम्यान थांबलेल्या वा धीम्या गतीने चालणाऱ्या मालगाड्यांतील कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पुलगाव, भूगाव येथेही सर्रास कोळसा चोरी होत असल्याचे दिसून येते. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.नागपूर ते बडनेरा दरम्यान असलेल्या सिंदी रेल्वे, सेवाग्राम, वर्धा, भूगाव, दहेगाव, कवठा, पुलगाव आदी रेल्वे स्थानकांवर मालगाड्या थांबून असतात. काही गाड्या मधेही थांबविल्या जातात. यातील कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्या थांबल्यास दहेगाव, कवठा, पुलगाव, भूगाव आणि वर्धा ते सेवाग्राम दरम्यान मुले, महिला कोळशाची चोरी करतात. मुले थेट गाडीवर चढून तेथील कोळसा काढून घेतात. अनेक ठिकाणी धिम्या गतीने चालणाऱ्या मालगाडीमध्ये चढून मुले कोळखा खाली फेकतात. यानंतर महिला वा तीच मुले परत येऊन तो कोळसा गोळा करतात. हा कोळसा प्लास्टिक पोत्यांमध्ये भरून घरी वा विकण्याकरिता नेला जातो. हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. पुलगाव रेल्वे स्थानकावर दररोज प्लास्टिकचे पोते घेऊन जाणाऱ्या महिला आढळून येतात. यात कोळसा भरलेला असतो. काही ठिकाणी या कोळशावर गरीब कुटुंबाची चुल पेटते तर काही मुले कोळसा विकून मद्यपान करीत असल्याचेही आढळून येते. हा प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे. रेल्वे पोलिसांची सोय नसलेल्या स्थानकांवर हा प्रकार अधिक दिसतो. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)चोरीच्या कोळशावर पेटतात अनेकांच्या चुलीवर्धा ते पुलगाव तसेच भूगाव परिसरात कोळशाची चोरी होत असून त्यावर अनेक घरांतील चुली पेटत असल्याचे वास्तव आहे. काही रेल्वे स्थानकांवर दररोज महिला कोळसा घेऊन जाताना आढळून येतात. काही भागात चोरटी मुलेही सक्रिय असल्याचे दिसते. रेल्वेचे लोखंड आणि कोळसा चोरून ही मुले मद्यपान तसेच अन्य व्यसन पूर्ण करीत असल्याचे दिसून येते. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी व रेल्वेचे नुकसान टाळावे अशी मागणी होत आहे.