शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कापूस खरेदी बंद होण्याचे संकेत

By admin | Updated: February 8, 2016 02:13 IST

कापूस उत्पादकांनी शासकीय कापूस संकलन केंद्रांकडे पाठ दाखविल्याने येथे नाममात्र कापसाची खरेदी झाली आहे.

फणिंद्र रघाटाटे वर्धाकापूस उत्पादकांनी शासकीय कापूस संकलन केंद्रांकडे पाठ दाखविल्याने येथे नाममात्र कापसाची खरेदी झाली आहे. शासकीय केंद्रांवर कापूस येत नसल्याने ती बंद करण्याच्या हालचाली शासनाच्या यंत्रणेकडून होत आहे. याचा फटका कापूस उत्पादकांना बसणार आहे. शासकीय यंत्रणेचे कापूस संकलन केंद्र बंद होताच व्यापाऱ्यांकडून मिळणारे दर पडणे निश्चित आहे. राज्यात कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम या शासकीय एजन्सी व खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहेत. कापसाची नापिकी लक्षात घेता देशात मागील वर्षीच्या शिल्लक गाठी जमा धरताही ३०० लाख गाठीचे उत्पादन होणे शक्य नाही. आतापर्यंत २००० लाख गाठी बांधल्या जातील एवढाही कापूस खरेदी झाला नाही. देशातील सूतगिरण्यांना ३२५ लक्ष कापूस गाठीची आवश्यकता असते. निर्यातीस पूरक वातावरण नसले, तरी यंदाचे कापूस उत्पादन देशातील सूतगिरण्यांनाच कमी पडणार आहेत ही वस्तूस्थिती आहे. भविष्यात कापसाचे भाव वाढणार अशी जाणकार शेतकऱ्यांना आशा आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरी भरून ठेवला आहे. अजूनही २५ ते ३० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरी आहे. शासनाची खरेदी केंद्रे सुरू असल्यानेच ४५०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटलने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. भविष्यात ५००० रुपये पर्यंत कापूस वाढेल ही आशा आहे. जर एवढ्यातच शासनाने आपली खरेदी केंद्रे बंद केली तर ते खासगी व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडेल. ते कापसाचे भाव पाडतील. नुकतीच नाफेडने तूर खरेदी बंद केल्याबरोबर खासगी व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव १ हजार रुपयांनी पाडले. हाच अनुभव कापसाबाबतही येईल म्हणून शासनाने आपली कापूस खरेदी केंद्रे बंद न करता ती सुरूच ठेवावी अशी समस्त कापूस उत्पादकांची मागणी आहे.