शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कापूस खरेदी बंद होण्याचे संकेत

By admin | Updated: February 8, 2016 02:13 IST

कापूस उत्पादकांनी शासकीय कापूस संकलन केंद्रांकडे पाठ दाखविल्याने येथे नाममात्र कापसाची खरेदी झाली आहे.

फणिंद्र रघाटाटे वर्धाकापूस उत्पादकांनी शासकीय कापूस संकलन केंद्रांकडे पाठ दाखविल्याने येथे नाममात्र कापसाची खरेदी झाली आहे. शासकीय केंद्रांवर कापूस येत नसल्याने ती बंद करण्याच्या हालचाली शासनाच्या यंत्रणेकडून होत आहे. याचा फटका कापूस उत्पादकांना बसणार आहे. शासकीय यंत्रणेचे कापूस संकलन केंद्र बंद होताच व्यापाऱ्यांकडून मिळणारे दर पडणे निश्चित आहे. राज्यात कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम या शासकीय एजन्सी व खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहेत. कापसाची नापिकी लक्षात घेता देशात मागील वर्षीच्या शिल्लक गाठी जमा धरताही ३०० लाख गाठीचे उत्पादन होणे शक्य नाही. आतापर्यंत २००० लाख गाठी बांधल्या जातील एवढाही कापूस खरेदी झाला नाही. देशातील सूतगिरण्यांना ३२५ लक्ष कापूस गाठीची आवश्यकता असते. निर्यातीस पूरक वातावरण नसले, तरी यंदाचे कापूस उत्पादन देशातील सूतगिरण्यांनाच कमी पडणार आहेत ही वस्तूस्थिती आहे. भविष्यात कापसाचे भाव वाढणार अशी जाणकार शेतकऱ्यांना आशा आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरी भरून ठेवला आहे. अजूनही २५ ते ३० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरी आहे. शासनाची खरेदी केंद्रे सुरू असल्यानेच ४५०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटलने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. भविष्यात ५००० रुपये पर्यंत कापूस वाढेल ही आशा आहे. जर एवढ्यातच शासनाने आपली खरेदी केंद्रे बंद केली तर ते खासगी व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडेल. ते कापसाचे भाव पाडतील. नुकतीच नाफेडने तूर खरेदी बंद केल्याबरोबर खासगी व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव १ हजार रुपयांनी पाडले. हाच अनुभव कापसाबाबतही येईल म्हणून शासनाने आपली कापूस खरेदी केंद्रे बंद न करता ती सुरूच ठेवावी अशी समस्त कापूस उत्पादकांची मागणी आहे.