शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

रावण दहण प्रथा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:23 IST

महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्यावतीने केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी संघर्ष कृति समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्यावतीने केली आहे.या मागणीचे उपविभागीय अधिकाºयां मार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.राजा रावणासारखा महापराक्रमी योध्दा झाला नसून यापुढेहीे होणार नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मुर्ती ही मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मिटर उंचीची आहे. महाराष्टÑात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड येथे रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे. परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहण करण्याची परवानगी न देता; ही प्रथाच बंद करण्यात यावी.दसºयाच्या दिवशी रावण दहण करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल. या दरम्यान जे बगर आदिवासी यांचे समर्थन करतील, आमच्या भावना दुखावतील, आमच्या न्यायप्रिय राजाचा अपमान करतील अशा लोकांविरूध्द अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९८ मुंबई पोलीस कायदा १३१, १३४, १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्या वतीने निवेदनातून केली आहे. उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना संघर्ष समितीचे शंकर मोहमारे, विनोद उईके, अमोल सलामे, सुभाष पुटके, सोनु मडावी, नलिनी सयाम, संजय सयाम, नरेश उईके यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dasaraदसरा