शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

धाडी गावात अस्वच्छतेचा कळस; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:50 IST

धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही.

नाल्या तुंबल्याने साचली गटारगंगा : ग्रामपंचायत विकास कामे सोडून राजकारणात दंग लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने गटारगंगा साचली आहे. ग्रामसेवक सुटीवर असून सरपंच विकास सोडून राजकाणात दंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. नाल्या तुंबल्यामुळे अळ्या तयार झाल्या आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार तोंड वर काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी उकिरडे साचले आहे. त्याखाली पाणी साचल्याने अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक विहिरीत ब्लीचिंग पावडर टाकले नाही. यामुळे गावातील नागरिकांना दूषित व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांनाही त्याच पाण्याची सवय करून घ्यावी लागत आहे. शौचालय बांधकाम अपूर्ण असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गावातील पथदिवे कित्येक वर्षांपासून पडलेले आहेत. गावातील नागरिक कराचा भरणा करीत असले तरी ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे त्यांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. आष्टी-साहूर मार्गावर धाडी गाव असल्याने येथे अधिकारी वारंवार भेटी देतात. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छता करीत नाही. पाटील यांच्या घरासमोर मोठे डबके साचले आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये घाण साचली आहे. वॉर्डातील नागरिक ओरडून थकले; पण कारवाई झाली नाही. मोठी ग्रामपंचायत असताना विकास कामांत माघारल्याचे दिसून येत आहे. गावातील सूमार दर्जाची कामे केविलवाणी अवस्था दर्शविणारी आहे. रस्त्यावरील उकिरडे साफ करून दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धाडी गावाला एकदा भेट द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.