शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बसस्थानकात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:43 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना दुर्गंधीचा त्रास : व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे सदर खासगी कंपनीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह प्रवाशांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सदर खासगी कंपनीला योग्य सुचना देण्याची गरज आहे.जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा शहरात दररोज विविध कामानिमित्त अनेक शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र, ज्या ठिकाणी वर्धा शहरात येताच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रथम पाऊल पडते तोच वर्धा बस स्थानकाचा परिसराची दैना पाहून नागरिकांकडून सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्धा बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय पावसामुळे ओला झालेला कचरा गत काही दिवसांपासून त्याच परिसरात कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.ज्या खासगी कंपनीला वर्धा बस स्थानक नेहमीच स्वच्छ रहावे यासाठीचा कंत्राट दिला आहे, त्याच कंपनीचे सुमारे पाच कर्मचारी तेथे दररोज कार्यरत केले जातात; पण तेही आपल्या मनमर्जीनेच काम करीत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य राहत असल्याचे परिसरातील व्यावसायिक सांगतात. प्रवाशांचे सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बसस्थानक व्यवस्थापक व रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्धा बसस्थानक नेहमीच स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी एका खासगी कंपनीला जिल्ह्यातील सर्वच बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. वेतन न मिळाल्याने सदर कंपनीच्या कर्मचाºयांनी गत काही दिवस त्यांचे काम केले नाही. त्यामुळे कदाचित परिसरात घाणीचे साम्राज्य असेल. वेळीच बसस्थानक स्वच्छ करण्याच्या सुचना देण्यात येईल.- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.