शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कोटींचे ‘क्लिअरिंग’ रखडणार!

By admin | Updated: October 19, 2015 02:15 IST

विजयादशमीसह लागून आलेल्या दोन सुट्यामुळे जिल्ह्यातील बँका पुढील आठवड्यात तीन दिवस बंद राहणार आहे.

बँकिंग असुविधा : पुढील आठवड्यात बँका तीन दिवस बंद, बाजारातील अर्थचक्राला फटकावर्धा : विजयादशमीसह लागून आलेल्या दोन सुट्यामुळे जिल्ह्यातील बँका पुढील आठवड्यात तीन दिवस बंद राहणार आहे. परिणामी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा क्षेत्रीय बँकांच्या विविध शाखांमधील उलाढाल तीन दिवस ठप्प पडणार आहे. त्यामुळे या तीन दिवसात जिल्ह्यातील कोटींचे क्लिअरिंगचे कामकाज प्रभावित होणार आहे. मात्र आॅनलाईन प्रक्रियेचा वापर ग्राहकांकडून होत असल्याने त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचे अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले आहे. ही समस्या विचारात घेता अग्रणी बँकेने संबंधित बँकांना पुढील आठवड्यात जिल्ह्यातील एटीएममध्ये दोन वेळा रकमेचा भरणा करण्यासंदर्भात सूचित केले आहे. सण-उत्सवाच्या काळातच बँका बंद राहणार असल्याने बाजारातील अर्थचक्राला फटका बसणार आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सण-उत्सवाचा आहे. या कालावधीत नेहमीच बँकांना सलग सुट्या आल्याचा इतिहास आहे; पण यावर्षी या सलग सुट्या आल्या नसल्या तरी गुरुवारी विजयादशमी असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहे. २३ आॅक्टोबरला बँका सुरू राहणार असल्या तरी २४ आॅक्टोबरला चौथा शनिवार आणि २५ आॅक्टोबरला लगोलग रविवार आल्याने सर्वसामान्यांचे बँकिंग व्यवहार ठप्प पडणार आहे. सण-उत्सव काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते; परंतु या सुट्या आल्यामुळे बाजारपेठेतील अर्थचक्र प्रभावित होणार आहे. नागरिकांची एटीएमवर मदार राहणार असल्याने एटीएमवर मोठा ताण येणार आहे. परिणामी बँकांना एटीएममध्ये किमान दोन वेळा रोख रकमेचा भरणा करावा लागणार आहे. त्यानुषंगाने सध्या बँकांनी हालचाली सुरू केल्या आहे. (प्रतिनिधी)सलग सुट्या आल्यास एका सुटीचे समायोजनाँकांना सलग तीन दिवस सुट्या आल्यास त्यातील एक दिवसाची सुटी ही समायोजित केली जाते. १८८१ च्या परक्राम्य लेखा अधिनियमानुसार ती समायोजित करतात. त्यामुळे बँकांना सलग तीन दिवस सुटी राहू शकत नाही. यावर्षी सुदैवाने दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी बँका सुरू राहणार असल्याने सुटी समायोजित करण्याची गरज पडलेली नाही.प्रतिदिन १५० कोटींचे क्लिअरिंगजल्ह्यातील राष्ट्रीयकृत व काही खासगी बँकांच्या एकूण सुमारे १०० शाखा आाहे. यातून दररोज १५० कोटी रुपयांचे रोख व धनादेशाद्वारे व्यवहार होता. बँका तीन दिवस बंद राहणार असल्याने तीन दिवसाचे सुमारे ४५० कोटी रुपयांचे क्लिअरिंंग त्यामुळे प्रभावित होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे २६ आॅक्टोबरला बँका पुन्हा सुरळीत सुरू होतील, तेव्हा नागरिकांची बँकामध्ये मोठी गर्दी होण्याचे संकेत आहेत.सध्या आॅनलाईन व्यवहार होत आहे. यामुळे बँक बंद असल्याचा विशेष परिणाम जाणवत नाही. नागरिक त्यांचे व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करीत असतात. शिवाय मदतील एटीएम आहे. केवळ धनादेशाचे व्यवहार या सुट्यांमुळे विस्कळीत होतील. सर्वसामान्य नागरिकावर त्याचा विशेष परिणाम होणार नाही. या सुट्या सलग नसून मध्ये एक दिवस बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याने व्यवहारावर विशेष प्रभाव पडणार नाही.- विजय जांगडा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.