शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

‘आलेखन’ स्पर्धेतून स्वच्छतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:39 IST

शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा सध्या वर्धा नगर परिषदेने उचलला आहे.

ठळक मुद्देवर्धा नगरपरिषदेचा उपक्रम : जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचे घेणार सहकार्य

आॅनलाईन लोकमतवर्धा : शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा सध्या वर्धा नगर परिषदेने उचलला आहे. त्या दिशेने सध्या प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मोहिमेसाठी प्रभावी जनजागृती करता यावी म्हणून नगर परिषद व सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून शहरवासियांना स्वच्छतेचे धडे देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या प्रचार-प्रसाराचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. स्पर्धेच्या प्रचार-प्रसार मोहिमेदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील दोन व्यावसायिकांना कचरा जाळल्याचे कारण देत १० हजारांचा दंड आकारण्यात आला असून त्याची वसुलीही करण्यात आली आहे.‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ या विषयावर आधारित ‘आलेखन’ या खुल्या भिंती चित्र स्पर्धेत चार-चार विद्यार्थ्यांची एक चमू, असे सुमारे १०० गट सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५५ गटांची नोंदणी झाली आहे. इतकेच नव्हे तर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी काही कर्मचाºयांची नगर परिषद कार्यालयातील स्वच्छता विभागात नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.स्वच्छ व सुंदर वर्धेकरिता आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. यातून काही काळ शहर स्वच्छही झाले; पण यातील सातत्य कायम न राहिल्याने सध्या शहरात कचºयाचे साम्राज्य दिसतेच. यावर उपाय आता आखण्यात आले आहेत.अस्वच्छता करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाईनागरिकांकडून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी त्यांना दोन वेगवेगळ्या रंगांच्या छोट्या कचरा पेट्या नगर पालिकेच्यावतीने देण्यात येत आहेत. अवघ्या आठ दिवसांमध्ये १२६ कुटुंबीयांना सदर कचरा पेट्या देण्यात आल्या आहेत. घरातील कचरा रस्त्यावर टाकणाºयांवर व परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांवर २०० ते १००० रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.कचरा जाळणे भोवलेनेहमी कचरा जाळणाऱ्या शहरातील दोन व्यावसायिकांवर न.प. स्वच्छता विभागातील कर्मचाºयांनी थेट दंडात्मक कारवाई केली. त्या दोन्ही व्यावसायिकांकडून न.प. प्रशासनाने १० हजारांचा दंड वसूल केला आहे.घंटा गाडीद्वारे गोळा होतो कचरास्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या उद्देशाने सध्या वर्धा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातून दहा मालवाहू घंटा गाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. नागरिकांना घरातील ओला व सुका कचरा घरातच वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करण्यासाठी छोट्या कचरापेट्या न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या नेतृत्त्वात देण्यात येत आहेत. आतापर्यंत १२६ कुटुंबीयांना सदर कचरा पेट्या वितरित करण्यात आल्या असून पाच टप्प्यात २६ हजार कुटुंबांना कचरा पेट्या देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा हजार कुटुंबाला कचरा पेटी देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.स्वच्छ वर्धेच्या स्वप्नपूर्तीसाठी आलेखन या खुल्या भिंती चित्र स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता तो घरातच न.प. द्वारे दिल्या जाणाºया दोन वेगवेगळ्या कचरा पेटीत गोळा करावा. तो न.प.च्या घंटागाडी धारकांना द्यावा. घंटागाडी आपल्या भागात येत नसल्यास त्याबाबतची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे करावी.- प्रवीण बोरकर, आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.