शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’च

By admin | Updated: April 1, 2015 01:51 IST

देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले;

वर्धा : देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले; पण जनजागृतीचा अभाव व प्रशासकीय उदासिनतेमुळे ते दिवसांपूरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ फलकांचा गाजावाजा करीत ‘क्लीन अप’चा नारा देण्यात आला़ यासाठी प्रजासत्ताक दिनी मुहूर्तही शोधण्यात आला; पण शहरातील हे अभियान दिवसापूरतेच ठरले़ सध्या शहरासह सभोवताल कचऱ्याचेच साम्राज्य दिसते़ यामुळे ‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’ झाल्याचेच दिसते़जिल्हा प्रशासन, नगर परिषद, सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़ एकाच दिवशी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला़ यात बजाज चौकातील भाजी बाजार, गोल बाजार, मुख्य मार्ग तसेच शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये यासह अन्य परिसरातही स्वच्छता अभियान राबविले गेले़ यात जागोजागी फलकही लावण्यात आले; पण स्वच्छता दिवसापूरतीच ठरली़ एकाच दिवसात विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली; पण जनजागृती करण्यात आली नाही़ यामुळे नागरिकांना पाहिजे तसा सहभाग मिळाला नाही़ सध्या शहरातील मुख्य भाजी बाजार, गोलबाजार व शहराच्या सभोतालचा परिसर अस्वच्छच दिसतो़ जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे़ या भागातील नाल्यांमध्ये बेशरम वाढलेली असून या परिसराला स्वच्छता अभियान शिवलेच नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)