शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

‘स्वच्छ भारत’ला ग्रामीण भागात खोे

By admin | Updated: March 29, 2015 02:10 IST

उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर शौचालय बांधण्याची योजना अंमलात आली. अनेकांनी योजनेचा लाभ घेत शौचालय बांधले; मात्र त्याचा वापर होत नसल्याचे गावाच्या शिवेवर जाताच दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी गाव येताच येणारी दुर्गंधी कायमच असल्याचे दिसते. यावर प्रतिबंध लावण्याकरिता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग पथक’ निर्माण करण्यात आले. या पथकांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शासनाची ही योजना राबविण्यात कर्मचारीही निरस असल्याने ती यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायत अधिनियम १९८५ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन करण्यात आले आहे. यात गावातील गणमान्य व्यक्तीचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर ‘गुड मॉर्निंग पथक’च्यावतीने गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे. ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटसअ‍ॅपसारखे अ‍ॅप तयार करून स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अद्यापही झालेली नाही. या निर्णयावर कारवाई सुरू झाली त्यावर अंमलबजावणीची शंकाच आहे. ग्रामीण भागात शासनाच्या योजना कुचकामी ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)